शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत हळद संशोधनाचे उपकेंद्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:55 IST

डिफेन्सच्या प्रकल्पासाठीही लवकरच बैठक

सांगली : हळदीनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीत वसमत येथील हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच बैठक होईल. तसेच डिफेन्स प्रकल्प सांगलीत आणण्यासाठी लवकरच बैठक घेऊ, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे येथील न्यू प्राईड हॉटेलमध्ये पश्चिम महाराष्ट्र उद्योग व्यापार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयंत पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमाकांत मालू, नीता केळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री सामंत म्हणाले, आचारसंहिता काळात राजकारण करायचे असते आणि नंतर विकास कामासाठी सर्वांनी एकत्र येणे अपेक्षित असते. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले तर मग विकासाच्या गोष्टी मागे पडतात. या परिषदेत सांगलीत एअर स्ट्रीपची मागणी करण्यात आली. परंतु आता एअरस्ट्रीपबाबत नियम बदलले आहेत. तुमच्या भावना समजू शकतो. जर एअर स्ट्रीपबाबत लांबी, रुंदीबाबत तसेच रडारबाबत सुविधा झाली तर सांगलीत चांगले एअरपोर्ट होऊ शकते. हळदीबाबत परिषदेत चर्चा झाली. वसमत येथे हळद संशोधन केंद्र उभारण्यास आले आहे. आमदार हेमंत पाटील हे अध्यक्ष असून त्यांनी सांगलीला उपकेंद्र मंजूर करण्याची ग्वाही दिली आहे. त्यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल.पश्चिम महाराष्ट्रात सातारा येथे म्हसवडमध्ये साडेतीन हजार एकर जागा संपादित करून एमआयडीसी उभारली जाणार आहे. सांगलीत जर जागा देणारे शेतकरी असतील एमआयडीसी करता येईल. एखादा प्रकल्प उभारताना त्याचे समर्थन करणाऱ्या समितीऐवजी बऱ्याच ठिकाणी संघर्ष समिती स्थापन होते. चांगल्या प्रकल्पांना समर्थन दिले पाहिजे. डिफेन्सचे प्रकल्प काही ठिकाणी उभारले जाणार आहेत. सांगलीतदेखील हा प्रकल्प उभारण्यासाठी बैठक घेतली जाईल. दावोस येथील परिषदेतून महाराष्ट्रात १५ लाख ७० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा निर्णय झाला. येत्या तीन वर्षात त्यातून किमान १२ लाख कोटींची शाश्वत गुंतवणूक महाराष्ट्रात होऊन १० ते १२ लाख जणांना रोजगार मिळेल.

पालकमंत्री पाटील म्हणाले, एमआयडीसीमधील रस्त्यांचा प्रश्न येथे चर्चेत आला. तत्कालीन नगरपालिकेने एमआयडीसीमध्ये रस्ते त्यांच्याकडे का घेतले समजत नाही. परंतु आता रस्त्याबाबत पाठपुरावा करू. मंत्री सामंत यांनी परिषदेत ज्या घोषणा केल्या आहेत, त्याचा पालकमंत्री म्हणून पाठपुरावा केला जाईल. सध्याच्या काळात पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल ज्ञान आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात इंडस्ट्रीजसाठी ज्या कौशल्याचे मनुष्यबळ हवे असेल त्याप्रमाणे कौशल्याचे मनुष्यबळ देण्यासाठी आवश्यक कोर्स सुरू करण्याचा प्रयत्न असेल.आमदार जयंत पाटील म्हणाले, अलकूडमध्ये एमआयडीसी होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. परंतु इरिगेशनचे क्षेत्र असलेल्या जमिनीचे संपादन करताना अडचणी येतात. सांगलीत मोठी गुंतवणूक आली तर पेन्शनरांचे शहर ही ओळख बदलेल. नावीन्यपूर्ण शोधासाठी इंडस्ट्रीजनी अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर गरजा मांडाव्यात. त्यासाठी इंडस्ट्रीज आणि अभियांत्रिकी महाविद्यालये यांचा एक फोरम स्थापन झाला पाहिजे.यावेळी ललित गांधी, रवींद्र माणगावे, नीता केळकर, प्रवीण लुंकड यांनी उद्योजक, व्यापारी यांच्यापुढील अडचणी मांडून उपाय सुचविले. या परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्र गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य रमेश आरवाडे, संजय अराणके, उद्योजक रौनक शहा, भालचंद्र पाटील, सर्जेराव नलवडे, प्रकाश शहा, चेतन चव्हाण, अर्चना पवार, सचिन घेवारे आदी पदाधिकारी, उद्योजक, व्यापारी उपस्थित होते.

जिल्ह्यांना छोटे प्रकल्प द्याललित गांधी म्हणाले, दावोस येथे १६ लाख कोटी गुंतवणुकीचे करार केले आहेत. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात छोटे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात इन्फ्रास्ट्रक्चर असणे आवश्यक आहे.

उद्योगमित्र बैठका व्हाव्यातललित गांधी म्हणाले, अनेक जिल्ह्यात उद्योग मित्र समितीची बैठक होत नाही. काही जिल्हाधिकारी बैठकांना उपस्थित राहत नाही. केवळ औपचारिकपणे बैठका घेतल्या जातात. स्थानिक प्रश्न सुटले पाहिजेत. परंतु जिल्हाधिकारी हजार राहत नसल्यामुळे निर्णय होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात या बैठक नियमित होण्यासाठी आदेश द्यावेत.

टॅग्स :SangliसांगलीUday Samantउदय सामंत