शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बीडच्या मानवलोककडून पूरग्रस्तांची खरी मानवसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 7:35 PM

इथल्या पूरग्रस्तांना या संस्थेच्या २३ कार्यकर्त्यांनी संस्मरणीय असा मदतीचा हात दिला. १३ आॅगस्टपासून सुरु झालेले अन्नदानाचे काम गुरुवारी, २२ आॅगस्टरोजीही सुरुच होते.

ठळक मुद्दे१३ आॅगस्टपासून सुरु झालेले अन्नदानाचे काम गुरुवारी, २२ आॅगस्टरोजीही सुरुच होते.

सतीश पाटील ।बुधगाव : संकटकाळात गरजूंच्या मदतीला धावून जाणे, हे खऱ्या माणुसकीचे गुणवैशिष्ट्य असते. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरानंतर, ४०० कि.मी. अंतरावर असलेल्या अंबाजोगाई (जि. बीड)च्या मानवलोक संस्थेला या गुणवैशिष्ट्यानेच येथे खेचून आणले. सलग बारा दिवसांपासून या संस्थेचे मदतकार्य सुरु आहे.

सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ, खटाव, वसगडे, माळवाडी, भिलवडी, चोपडेवाडी, बोरबन, सुखवाडी, मौजे डिग्रज, पद्माळे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी आणि राजापूरवाडी इथल्या पूरग्रस्तांना या संस्थेच्या २३ कार्यकर्त्यांनी संस्मरणीय असा मदतीचा हात दिला. संस्थेने तीन जेसीबींच्या मदतीने तब्बल बारा दिवस अहोरात्र स्वच्छतेचे काम केले.

सांगली जिल्ह्यातील दहा गावांमध्ये, तर कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी पूरग्रस्तांना ह्यकम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नदान केले. सुमारे १५ हजार लोकांना त्याचा लाभ झाला. गाळाने भरलेले रस्ते जेसीबीच्या मदतीने साफ करण्याबरोबरच सुमारे ३० मृत जनावरांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे महत्त्वाचे काम या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. १२ आॅगस्ट ते २१ आॅगस्टअखेर दहा दिवस हे काम चालले. १३ आॅगस्टपासून सुरु झालेले अन्नदानाचे काम गुरुवारी, २२ आॅगस्टरोजीही सुरुच होते.

मानवलोकण ही संस्था १९८२ मध्ये डॉ. द्वारकादास लोहिया या ध्येयवेड्या माणसाने अंबाजोगाईत सुरु केली. ही संस्था नावारुपास आली, ती १९९३ च्या किल्लारी भूकंपावेळी. मानवलोकणचे कार्यकर्ते त्यावेळीही किल्लारीत पोहोचले होते. संस्थेच्या या मदतकार्याबद्दल युनिसेफच्या अधिकारी पथकाने तसेच गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी संस्थेला कौतुकाची थाप दिली आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरSocialसामाजिक