शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कोयना, पुणे पॅसेंजरच्या गोंधळाचा प्रवाशांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 22:07 IST

सध्या पुणे-मुंबईदरम्यान मंकी हिल्स येथे दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच जाते व तेथून परत कोल्हापूरला परतते. ३० नोव्हेंबरपर्यंत हीच स्थिती राहणार आहे. तिचे हे बदललेले वेळापत्रक सांगली-साताऱ्यातील प्रवाशांना गैरसोयीचे ठरले आहे.

ठळक मुद्देमहिनाअखेरपर्यंत हीच स्थिती, एसटीने प्रवासाची वेळ

सांगली : कोयना एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-पुणे पॅसेंजरच्या वेळापत्रकातील गोंधळामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे. सांगली, कºहाडसह ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडीच्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.प्रवाशांनी पुणे विभागीय व्यवस्थापकांना निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. नोकरदार आणि विद्यार्थ्यांची संख्या खूपच मोठी आहे.

सध्या पुणे-मुंबईदरम्यान मंकी हिल्स येथे दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच जाते व तेथून परत कोल्हापूरला परतते. ३० नोव्हेंबरपर्यंत हीच स्थिती राहणार आहे. तिचे हे बदललेले वेळापत्रक सांगली-साताऱ्यातील प्रवाशांना गैरसोयीचे ठरले आहे.

कोयना पुण्यातून दुपारी साडेतीन वाजता परत फिरते. ती सातारा, कºहाड, शेणोली, किर्लोस्करवाडी, भिलवडी व सांगलीला येण्यास रात्री नऊ ते अकरा वाजतात. ही वेळ प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीची आहे. विश्ोषत: महिला, विद्यार्थी व नोकरदारांचे हाल होत आहेत. पुणे-कोल्हापूर पॅसेंजर कºहाडमध्ये दुपारी चार वाजता येते. सांगली-कोल्हापूरकडे येणारे विद्यार्थी व नोकरदारांना तिचा फायदा होत नाही. स्टेशनवर येईपर्यंत गाडी निघून गेलेली असते. सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर दुसºया रेल्वेसाठी रात्री नऊ-दहापर्यंत थांबावे लागते. प्रवाशांना जास्त पैसे खर्च करुन एसटीने प्रवास करावा लागत आहे. पुणे-कोल्हापूर पॅसेंजर पुण्यातून एक ते दीड तास उशिरा सोडल्यास प्रवाशांना तिचा फायदा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.पुणे पॅसेंजरला सातत्याने उशीरकोल्हापूर-पुणे पॅसेंजर पहाटे सहा वाजता मिरजेत येते. तेथून सांगलीत येण्यास मात्र तब्बल पाऊण तास घेते. पावणेसात ते सात वाजून जातात. दहा मिनिटांच्या अंतरासाठी गाडी तासभर घेते. प्रशासनातील समन्वयाअभावी गाडी विलंबाने धावत आहे. कºहाड-साताºयाकडे जाणाºया प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. तक्रार करूनही सुधारणा झाली नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

 

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगलीkolhapurकोल्हापूर