शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शहरी बस सेवेला प्रवाशांचा ठेंगा

By admin | Updated: December 2, 2014 23:33 IST

एसटीला आर्थिक फटका : प्रवाशांच्या संख्येत घट; अडचणीतील महामंडळासमोर चिंता

सदानंद औंधे - मिरज -सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असलेल्या महापालिका क्षेत्रातील शहरी बस सेवेचा तोटा वाढत असून सांगली व मिरज या दोन्ही आगारांना दरमहा दहा लाखांचा तोटा होत आहे. ८० बसेसद्वारे दरमहा सुमारे पाच लाख किलोमीटर अंतराच्या फेऱ्या करणाऱ्या प्रत्येक शहरी बसेसची दररोजची सरासरी प्रवासी संख्या ३२० एवढीच आहे. सांगली-मिरज शहरापासून २० कि.मी. अंतरापर्यंत शहरी बससेवा देणाऱ्या एसटीचे प्रवासी कमी होत असल्याने तोट्यातही वाढ होत आहे. मिरज आगाराच्या ४० व सांगली आगाराच्या ४० अशा ८० बसेस दररोज पहाटे पाचपासून रात्री ११ पर्यंत शहरी बससेवा करतात. शहरी बससेवेमुळे शहरातील व शहरालगत असलेल्या २४ गावांतील प्रवाशांची सोय झाली आहे. पण प्रवाशांनी पाठ फिरविल्याने गेल्या दहा वर्षात शहरी बस सेवेच्या तोट्यात वाढ होत आहे. मिरज व सांगली आगाराच्या शहरी बसेस दररोज पंधरा ते सोळा हजार कि.मी. फेऱ्या करतात. शहराचा विस्तार, लोकसंख्या व प्रवासी संख्या वाढल्यानंतरही शहरी बसने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. सांगली व मिरज आगारातील शहरी बसेसच्या प्रवाशांची सरासरी संख्या दरमहा २५ ते २६ हजार आहे. ही संख्या प्रतिबस ३२० एवढीच असल्याने दोन्ही आगारांना कोट्यवधीचा वार्षिक तोटा होत आहे. अवैध प्रवासी वाहतूक, परवानाधारक प्रवासी वाहतूकदारांच्या व दुचाकी वाहनधारकांच्या संख्येत वाढ, अनियमित बसफेऱ्या, बसेसची दुरवस्था अशा विविध कारणांमुळे शहरी बसेसचे प्रवासी कमी होत आहेत. तोट्यात असल्यामुळे शहरी बसेसच्या ताफ्यात एकही नवीन बस आली नसल्याचे सांगितले.महापालिकेचा नकारशहरी बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी यासाठी एसटीचे प्रयत्न आहेत. मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याच्या कारणावरून महापालिकेने तोट्यातील शहरी बससेवा चालविण्यास नकार दिल्याने तोट्याचा भार एसटी सहन करीत आहे. तुलनेने संख्या कमीशहरी बससेवा फायद्यात येण्यासाठी सध्याची सरासरी प्रवासी संख्या दुप्पट होणे आवश्यक आहे. एका वडाप रिक्षातून दररोज दिवसभरात ८० ते ९० प्रवाशांची वाहतूक होते. या तुलनेत शहरी बसेसची प्रवासी संख्या अत्यंत कमी आहे.