शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

द्राक्ष उत्पादकांना लुटणाऱ्या व्यापाऱ्यांना हवा नाशिक पॅटर्नचा दणका, ..तर फसवणुकीचे धाडस करणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 19:10 IST

सांगलीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक

सांगली : जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू होताच, व्यापाऱ्यांकडून फसवणुकीच्या बातम्याही येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्याच आठवड्यात तासगाव तालुक्यात ४७ लाखांच्या फसवणुकीची तक्रार झाली आहे. या पार्श्वभूमीवर पैसे वसुलीसाठी सांगलीतही नाशिक पॅटर्न राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये व्यापारी व दलालांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकविले होते. द्राक्षे घेऊन गायब झाले होते. शेतकऱ्यांनी पैशांसाठी व्यापाऱ्यांचा पिच्छा पुरवूनही दाद मिळत नव्हती. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. गुन्हे दाखल केल्यास कायदेशीर प्रक्रिया वर्षानुवर्षे चालेल, शेतकऱ्यांचा प्रश्न लवकर सुटणार नाही, हे लक्षात घेऊन तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी संबंधित व्यापाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावले. पैसे दिले नाहीत, तर गुन्हे दाखल करून पोलिस कोठडी दाखविण्याचा इशारा दिला. यामुळे घाबरलेल्या व्यापारी व दलालांनी शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाकले. पोलिसांनी कायदा व व्यवहाराची सांगड घालून प्रश्न सोडविला. सांगलीतही दरवर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक होते. शेतकऱ्यांनी वर्षभर कष्टाने पिकविलेली द्राक्षे व्यापारी डोळ्यांदेखत घेऊन गायब होतात. शेतकरी त्यांना शोधून त्यांच्या गावापर्यंत पोहोचतात, पण पैसे मिळत नाहीत. नाशिकमध्ये घटले फसवणुकीचे प्रमाण नाशिकच्या पोलिसांनी व्यापाऱ्यांना हिसका दाखविल्याने तेथील फसवणुकीचे प्रमाण कमी आले. शेतकरीही सतर्क झाले. याच नाशिक पॅटर्नची गरज सांगली जिल्ह्यातही आहे. पोलिसांनी वचक निर्माण केल्यास व्यापारी व दलाल फसवणुकीचे धाडस करणार नाहीत अशा प्रतिक्रिया आहेत.नोंदणी होते किती?शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी बाजार समितीने दलालांची नोंदणी सक्तीची केली आहे. पण किती नोंदणी होते हा संशोधनाचा विषय आहे. ४० कोटीचा चुनागेल्या दहा वर्षांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी सुमारे ३० ते ४० कोटींचा चुना लावल्याचा अंदाज आहे.यामुळे होते फसवणूकव्यापाऱ्यांचे पॅन, आधार व ओळखपत्र घेतल्याशिवाय व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिस करतात. फसवणुकीची तक्रार नोंदवून घेताना व्यापाऱ्याशी लेखी करार आहे का? याची विचारणा करतात. पण करारासाठी अडलेल्या शेतकऱ्याची द्राक्षे व्यापारी घेत नाहीत. बागेतून द्राक्षे पाऊसपाण्याचा फटका बसण्यापूर्वीच घालविण्यासाठी धडपडणारा शेतकरी करारमदार करण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळे त्याला फसवणुकीचा दणका बसतो. दर पाडण्याचेही कारस्थान केले जाते.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस