शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

व्यापाऱ्यांकडून डाळिंब उत्पादक शेतकºयांची लूट-दर पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 8:20 PM

आटपाडी : यंदा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही शेतकºयांनी मोठ्या कष्टाने निर्यातक्षम, दर्जेदार डाळिंब उत्पादित केली आहेत. मात्र तीन ...

ठळक मुद्देबाजार समितीने लक्ष देण्याची मागणी

आटपाडी : यंदा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही शेतकºयांनी मोठ्या कष्टाने निर्यातक्षम, दर्जेदार डाळिंब उत्पादित केली आहेत. मात्र तीन व्यापाºयांनी एकी करुन दर पाडून शेतकºयांची लूट सुरु केली आहे. मोठ्या प्रमाणात तालुक्यात व्यापारी येण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न करावेत, अशी डाळिंब उत्पादक शेतकºयांनी मागणी केली आहे.

तालुक्यात सध्या युरोपसह परदेशात डाळिंबाची निर्यात करण्यासाठी रसायनमुक्त डाळिंब मोठ्या प्रमाणात उत्पादन केले आहे. अशाप्रकारचे उत्पादन करण्यासाठी शेतकºयांना खूप नियोजन करुन जादा उत्पादन खर्च करावा लागत आहे. पण चांगला दर मिळेल या आशेने शेतकरी मोठा खर्च करीत आहेत. मोठ्या कष्टाने उत्पादन केलेल्या डाळिंबाला दर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

डाळिंब पक्व झाल्यानंतर व्यापारी बागेत येऊन शेतकºयांकडून ५ हजार रुपये घेऊन खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवितात. ४-६ दिवसानंतर अहवाल सकारात्मक आल्यानंतर मग १५० ते १७५ रुपयांऐवजी ८० ते १२० रुपये प्रतिकिलो या दराने २०० ग्रॅम वजनापेक्षा मोठी डाळिंबे मागतात. शेतकºयाने दुसºया व्यापाºयाला विचारणा केली तर, तो दुसरा व्यापारी पुन्हा शेतकºयांकडून ५ हजार रुपये घेतो. पुन्हा डाळिंबे घेऊन प्रयोगशाळेत पाठवितो. पुन्हा ५-६ दिवसांनी बागेत येऊन कमी दराने मागतो. शेतकºयाने दर जास्त मिळावा म्हणून तिसºया व्यापाºयाला विचारले तर तो म्हणतो, पुन्हा डाळिंबाची तपासणी करावी लागेल.

एवढा वेळ जाईपर्यंत फळे पक्व होतात. फळे जादा पक्व झाली तर जमिनीवर गळून पडतात. त्यामुळे शेतकरी नाईलाजाने मिळेल त्या दराने डाळिंब विकून मोकळा होतो. यात व्यापाºयांचा मोठा फायदा होत आहे, तर शेतकºयांची लूट केली जात आहे. यावर मोठ्या प्रमाणात तालुक्यात व्यापारी येण्याची गरज आहे. यासाठी सतीश वारवकर, चंद्रकांत राऊत, सुधाकर जाधव, नाथा यमगर, राहुल पावले, शिवकुमार साळुंखे, राहुल गायकवाड, प्रशांत गायकवाड, दत्तात्रय हजारे, विठ्ठल लिंगडे, किसन चव्हाण, जालिंदर सोन्नूर, काकासाहेब जाधव या शेतकºयांनी बाजार समितीकडे मागणी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी