शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

घाटमाथ्यावर पाणी विकत घेण्याची वेळ, बॅरेलला १०० रुपये : टँकरचा दर हजार रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:03 IST

सततच्या दुष्काळामुळे चालूवर्षीही वरुणराजाने चांगलीच पाठ फिरविल्याने कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. परिसरातील कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या

ठळक मुद्देकूपनलिका, विहिरी कोरड्या

जालिंदर शिंदे ।घाटनांद्रे : सततच्या दुष्काळामुळे चालूवर्षीही वरुणराजाने चांगलीच पाठ फिरविल्याने कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. परिसरातील कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. याठिकाणी खासगी चार पाण्याचे टँकर पाणी विकण्याचे अहोरात्र काम करीत आहेत.

घाटमाथ्यावर दुष्काळात तेरावा महिना आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका बॅरेलला १०० रुपये, तर टँकरला हजार रुपये मोजावे लागत आहेत. अगोदरच चालूवर्षी पावसाविना खरीप व रब्बी पेरा वाया गेला असल्याने शेतातील उत्पन्न थांबल्याने संपूर्ण अर्थकारण बिघडले आहे. त्यातच पाणी विकत घ्यावयाचे संकट ओढवले आहे.घाटमाथ्यावरील घाटनांद्रे गावाला गेली कित्येक वर्षे पाणीपुरवठा करणारी स्वतंत्र व्यवस्था होती. कूपनलिकेतील पाणी विहिरीत टाकून ते पाईपलाईनद्वारे टाकीत टाकून नळाद्वारे गावाला पाणी पुरवठा होत होता. परंतु

पाण्याविना गेल्या सहा महिन्यापासून ही व्यवस्था बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या महिन्यापासून पाण्याच्या टँकरची मागणी शासनदरबारी धूळ खात पडून आहे. त्यातच सर्वच लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन तात्काळ टँकर सुरु करण्याचे आश्वासन दिले. पण हे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसत आहे. जनावरे व बागा जतन करण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. साधारण माणसाला दिवसाकाठी २० लिटर, मोठ्या जनावरांना ४० लिटर, लहान जनावरांना २० लिटर, तर शेळी-मेंढीला ५ लिटर पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्या गावात टँकर सुरु झाले, त्या गावात जनावरांच्या पाण्याचा उल्लेखच नाही.

ना छावणी, ना पाणी, त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच द्राक्षबाग जतन करण्यासाठी एक एकरासाठी २ टँकर पाण्याची आवश्यकता असते. म्हणजे एका पाण्यासाठी दोन हजार खर्च येत आहे. त्यामुळे चांगलेच पाण्याचे संकट निर्माण झाले असून प्रशासन मात्र भेटी, बैठका व दौºयातच गुंग आहे.गाव, वाडी, वस्तीवर सध्या पाण्यासाठी टँकरची वाट पहावी लागत आहे. गाव व परिसरात किमान चार टँकर रात्रंदिवस पाणी विकण्याचे काम करीत असून प्रशासन मात्र अभ्यास दौºयावरच अडकले आहे.साधारणत: लागणारे पाणी व येणारा खर्च..प्रति दिन पाणी आवश्यक पाणी सध्या खर्चप्रति माणूस २० लिटर प्रतिदिनमोठे जनावर ४० लिटर प्रतिदिन बॅरेल १०० लहान जनावर २० लिटर प्रतिदिन रुपयेप्रमाणेशेळी/मेंढी ५ लिटर प्रतिदिनएक एकर बागेसाठी २ टँकर पाणी २०००

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई