शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दूध उत्पादनामध्ये तीन लाख लिटरची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 1:17 PM

महापुरात पशुधनाची हानी झाल्याने जिल्ह्यात दूध उत्पादन प्रतिदिन तीन लाख लिटरने घटले आहे. जिल्ह्यात सुमारे ४० हजार गाई, म्हैशी अशी पाळीव जनावरे असून, महापुरात जनावरांचा मृत्यू व चारा टंचाईमुळे दूध उत्पादन घटल्याची माहिती दुग्धविकास अधिकारी अरुण चौगुले यांनी दिली. दुधाच्या टंचाईमुळे दूध खरेदी दरात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदूध उत्पादनामध्ये तीन लाख लिटरची घटसहा महिन्यात दूध उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता

सदानंद औंधेमिरज : महापुरात पशुधनाची हानी झाल्याने जिल्ह्यात दूध उत्पादन प्रतिदिन तीन लाख लिटरने घटले आहे. जिल्ह्यात सुमारे ४० हजार गाई, म्हैशी अशी पाळीव जनावरे असून, महापुरात जनावरांचा मृत्यू व चारा टंचाईमुळे दूध उत्पादन घटल्याची माहिती दुग्धविकास अधिकारी अरुण चौगुले यांनी दिली. दुधाच्या टंचाईमुळे दूध खरेदी दरात वाढ झाली आहे.जिल्ह्यात नदीकाठावर असलेल्या चार तालुक्यांना आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुराचा फटका बसला. नदीकाठावरील चार तालुक्यांतच मोठ्या संख्येने दुभती जनावरे व दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. दररोज होणाऱ्या सुमारे १२ लाख लिटर दूध संकलनापैकी ४० टक्के गाईचे दूध आहे. जिल्ह्यात सरासरी १५ लाख लिटर दैनंदिन दूध संकलन होते. पावसाळ्यात दूध संकलनात वाढ होते; मात्र महापुरात पशुधनाची मोठ्याप्रमाणात हानी झाल्याने दूध उत्पादनास फटका बसला आहे. महापुरात हजारो जनावरांचा मृत्यू झाला.नदीकाठच्या गावात पुरामुळे व पूर नसलेल्या तालुक्यात चारा टंचाई असल्याने दूध उत्पादन घटल्याचे सांगण्यात आले. दुधाच्या टंचाईमुळे दूध पावडर उत्पादन केवळ ५ टक्क्यावर आले आहे. दुधाला मागणी असल्याने गाईच्या दुधाचा खरेदीदर १८ वरुन २९ रुपये, तर म्हैशीच्या दुधाचा ३८ वरून ४४ रुपयांवर पोहोचला आहे.मराठवाड्यातील अतिरिक्त दूध मिरजेच्या शासकीय दूध डेअरीत पावडर निर्मितीसाठी पाठविण्यात येत होते. मात्र दुधाच्या टंचाईमुळे मराठवाड्यातून येणारे दूध आता बंद झाल्याने शासकीय दूध डेअरीची खासगी संघांकडून होणारी पावडर निर्मिती बंद झाली आहे.आॅगस्टमध्ये आलेल्या जिल्ह्यातील महापुरानंतर १० लाखांवर आलेले दूध संकलन गेल्या पाच महिन्यात १२ लाखांवर आले असून, सरासरी दूध उत्पादनात अद्याप ३ लाखांची घट आहे. पुढील सहा महिन्यात दूध उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :milkदूधSangliसांगली