शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

सांगली जिल्ह्यातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश, येत्या शैक्षणिक वर्षात होणार अंमलबजावणी

By अशोक डोंबाळे | Updated: April 4, 2023 18:20 IST

राज्य शासनाचा पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय

सांगली : जिल्हा परिषद, महापालिका शाळांतील पहिली ते आठवीच्या तीन लाख ४५ हजार १४२ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात गणवेश देण्यात येणार आहे. बालवयात मुलांच्या मनात एकमेकांबद्दल जातीय भेदभाव निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाने तसा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यातील तीन लाख ४५ हजार १४२ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात मोफत गणवेश मिळणार आहेत. राज्य शासनाकडून प्रतिविद्यार्थी गणवेश ६०० रुपयांप्रमाणे अंदाजे २० कोटी ७० लाखाचा निधी मिळणार आहे. तो संबंधित शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग केला जाणार आहे. नेहमी गणवेशाचा रंग व कापड निश्चित करून शाळा व्यवस्थापन समिती गणवेश शिलाई करून घेते आणि शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना त्याचे वाटप होते.आता शिलाई काम करणाऱ्यांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. ठराविक मुलांनाच मोफत गणवेश मिळत असल्याने शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात जातीसंदर्भात भेदभावाची भावना निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी सर्वच मुलांना गणवेश देण्याची मागणी काही सामाजिक संघटनांनी केली होती. या मागणीचा विचार करून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व मुलांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी आहे विद्यार्थीसंख्यापहिली ३९५२६दुसरी ४२६२७तिसरी ४३६५८चौथी ४३६१५पाचवी ४४४८३सहावी ४३५३६सातवी ४३६०२आठवी ४४०९५एकूण ३४५१४२

राज्य शासनाने पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून त्यावर कार्यवाही केली जात आहे. शासनाकडून आदेश आल्यानंतर कार्यवाही होणार आहे. -मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाStudentविद्यार्थीzpजिल्हा परिषद