शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ, वाळवा, मिरजेत लम्पीचा शिरकाव; हजारो जनावरे बाधित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 18:05 IST

उपाययोजनानंतरही संसर्ग वाढत असल्यामुळे शेतकरी चिंतेत

सांगली : जिल्ह्यात तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा लम्पी स्कीनच्या आजाराची एंन्ट्री झाली आहे. मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा, जत तालुक्यांतील जनावरे बाधित झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी आलेल्या लाटेत तब्बल साडेसातशे जनावरे मृत्युमुखी पडली होती. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात आले आहे, मात्र उपाययोजनांनंतरही संसर्ग होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी काही भागात रिमझिम पाऊस सुरूच आहे. दलदल, डासांची पैदासामुळे लम्पी स्कीनने पुन्हा डोके वर काढले आहे. गाय, बैल, वासराला लम्पीची लागण होते. म्हशींच्या तुलनेत गायवर्गीय प्राण्यात रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने लागण लवकर होते. हा चर्मरोग असला, तरी संसर्गाने झपाट्याने पसरतो.मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील हजाराहून अधिक जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाकडून अद्याप नोंदणी करण्याबाबतच्या सूचना नसल्याने आकडेवारी समोर येत नसल्याचे स्पष्ट झाले. या तालुक्यातील सर्व जनावरांना लसीकरण केले, तरी काही जनावरांना नव्याने लागण झाली. याचा फटका दूध उत्पादनावरही होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. लम्पी त्वचारोगाच्या लक्षणांमध्ये ताप, डोळे आणि नाकातून स्त्राव, जास्त लाळ, पशुंच्या शरीरावर फोड येणे आणि दुधाचे उत्पादन कमी होणे, अशी लक्षणे दिसून येतात.

लक्षणे दिसताच उपचार करून घ्या : थोरेजिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण झाले आहे, पण काही तालुक्यांत काही जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. बाधित जनावराला चांगल्या जनावरापासून अलगीकरणात ठेवावे. प्राथमिक लक्षणे दिसताच स्थानिक पशुसंवर्धन दवाखान्यात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगFarmerशेतकरी