शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये हजारो गरजूंचे भरले पोट, शिवभोजन केंद्रचालकांनाही अनुदानाचा वेळेत घोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊन काळात रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला असताना अनेकांच्या पोटाची चिंता मिटवण्याचे काम जिल्ह्यातील २२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लॉकडाऊन काळात रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला असताना अनेकांच्या पोटाची चिंता मिटवण्याचे काम जिल्ह्यातील २२ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून सुरु आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे केंद्रांना वेळेत अनुदानाचा लाभ मिळत असल्याने ही योजना सुरळीत सुरु आहे.

जिल्ह्यात या केंद्रांवरून ३ हजार थाळ्या भोजन दिले जाते. सांगली जिल्ह्यात सर्वत्र शिवभोजन केंद्रे व्यवस्थित कार्यान्वित आहेत. गरजू लोकांना यापूर्वी दहा रुपयात जेवण देण्याची ही योजना हाेती. आता या थाळ्या मोफत दिल्या जाणार आहेत. एप्रिल २०२१पासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली. त्यामुळे रोजगार गेला तरी पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी आणलेली ही योजना उपयोगी ठरत आहे. दररोज ३ हजार लोक या योजनेचा लाभ घेत आहेत.

सर्व केंद्रांवर दुपारी २ वाजेपर्यंत थाळ्या संपलेल्या असतात. लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे अनेकांचा रोजगार या काळात बुडणार आहे. अशावेळी पोटासाठी या शिवभोजन थाळीचा आधार कष्टकरी व गरजू लोकांना मिळत आहे.

कोट

वेळेत अनुदान, प्रशासनाचे सहकार्य

सध्या एप्रिल महिन्यापर्यंतचे अनुदान मिळाले आहे. प्रशासनाकडून अत्यंत चांगले सहकार्य मिळत आहे. अनुदान कधीही प्रलंबित राहिले नाही. त्यामुळे योजना सुरळीतपणे सुरु आहे.

- विनायक रुपनर, केंद्रचालक

कोट

जिल्ह्यात एकाही केंद्राचे अनुदान थकलेले नाही. एप्रिलपर्यंतच्या अनुदानाचे वाटप झाले आहे. योजनेंतर्गत अनुदान वेळेत मिळते. मे महिन्याचे अनुदानही लवकरच मिळेल. त्यामुळे योजनेसमोर कोणत्याही अडचणी नाहीत.

- वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली

चौकट

जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र २२

दररोज थाळीचा लाभ घेणारे लोक ३०००

चौकट

प्रती थाळी ४० व ५० रुपये अनुदान

शिवभोजन थाळी महापालिका क्षेत्रात असेल तर त्या केंद्राला प्रती थाळी ५० रुपये अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील थाळीमागे ४० रुपये अनुदान दिले जात आहे. मागील आर्थिक वर्षात थाळीचा लाभ घेणाऱ्यांकडून १० रुपये घेऊन उर्वरित रकमेचे शासन अनुदान देत होते. ही योजना आता पूर्ण मोफत झाली आहे.

केंद्रचालकांकडून गरजूंसाठी पदरमोडही

दररोज दुपारी १२ ते २ यावेळेत शिवभोजन थाळी दिली जाते. अनेक केंद्रांवर दुपारी २ पूर्वीच थाळ्या संपलेल्या असतात. अनेक केंद्रचालक त्यांच्याकडील कोटा संपल्यानंतरही स्वखर्चातून गरजूंना भोजन व अन्य खाद्यपदार्थ देत असतात. याचे वारंवार दर्शन घडते.