शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
14
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
15
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
16
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
17
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
18
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
19
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
20
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल

लॉकडाऊनमध्ये हजारो गरजूंचे भरले पोट, शिवभोजन केंद्रचालकांनाही अनुदानाचा वेळेत घोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊन काळात रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला असताना अनेकांच्या पोटाची चिंता मिटवण्याचे काम जिल्ह्यातील २२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लॉकडाऊन काळात रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला असताना अनेकांच्या पोटाची चिंता मिटवण्याचे काम जिल्ह्यातील २२ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून सुरु आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे केंद्रांना वेळेत अनुदानाचा लाभ मिळत असल्याने ही योजना सुरळीत सुरु आहे.

जिल्ह्यात या केंद्रांवरून ३ हजार थाळ्या भोजन दिले जाते. सांगली जिल्ह्यात सर्वत्र शिवभोजन केंद्रे व्यवस्थित कार्यान्वित आहेत. गरजू लोकांना यापूर्वी दहा रुपयात जेवण देण्याची ही योजना हाेती. आता या थाळ्या मोफत दिल्या जाणार आहेत. एप्रिल २०२१पासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली. त्यामुळे रोजगार गेला तरी पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी आणलेली ही योजना उपयोगी ठरत आहे. दररोज ३ हजार लोक या योजनेचा लाभ घेत आहेत.

सर्व केंद्रांवर दुपारी २ वाजेपर्यंत थाळ्या संपलेल्या असतात. लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे अनेकांचा रोजगार या काळात बुडणार आहे. अशावेळी पोटासाठी या शिवभोजन थाळीचा आधार कष्टकरी व गरजू लोकांना मिळत आहे.

कोट

वेळेत अनुदान, प्रशासनाचे सहकार्य

सध्या एप्रिल महिन्यापर्यंतचे अनुदान मिळाले आहे. प्रशासनाकडून अत्यंत चांगले सहकार्य मिळत आहे. अनुदान कधीही प्रलंबित राहिले नाही. त्यामुळे योजना सुरळीतपणे सुरु आहे.

- विनायक रुपनर, केंद्रचालक

कोट

जिल्ह्यात एकाही केंद्राचे अनुदान थकलेले नाही. एप्रिलपर्यंतच्या अनुदानाचे वाटप झाले आहे. योजनेंतर्गत अनुदान वेळेत मिळते. मे महिन्याचे अनुदानही लवकरच मिळेल. त्यामुळे योजनेसमोर कोणत्याही अडचणी नाहीत.

- वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली

चौकट

जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र २२

दररोज थाळीचा लाभ घेणारे लोक ३०००

चौकट

प्रती थाळी ४० व ५० रुपये अनुदान

शिवभोजन थाळी महापालिका क्षेत्रात असेल तर त्या केंद्राला प्रती थाळी ५० रुपये अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील थाळीमागे ४० रुपये अनुदान दिले जात आहे. मागील आर्थिक वर्षात थाळीचा लाभ घेणाऱ्यांकडून १० रुपये घेऊन उर्वरित रकमेचे शासन अनुदान देत होते. ही योजना आता पूर्ण मोफत झाली आहे.

केंद्रचालकांकडून गरजूंसाठी पदरमोडही

दररोज दुपारी १२ ते २ यावेळेत शिवभोजन थाळी दिली जाते. अनेक केंद्रांवर दुपारी २ पूर्वीच थाळ्या संपलेल्या असतात. अनेक केंद्रचालक त्यांच्याकडील कोटा संपल्यानंतरही स्वखर्चातून गरजूंना भोजन व अन्य खाद्यपदार्थ देत असतात. याचे वारंवार दर्शन घडते.