शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

थरार : सांगलीत पोहणाऱ्यांच्या घोळक्यात घुसली १८ फुटी मगर!, ७० मुले बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 13:39 IST

कृष्णा नदीत पोहणा-यांच्या घोळक्यात अचानक १८ फुटी मगर घुसली अन् सा-यांचा एकच थरकाप उडाला.

सांगली : येथील कृष्णा नदीत पोहणा-यांच्या घोळक्यात अचानक १८ फुटी मगर घुसली अन् सा-यांचा एकच थरकाप उडाला. ‘पळा...बाहेर पडा...अरे मगर आली’, असे म्हणत प्रत्येकाची आरडाओरड आणि धावाधाव सुरु झाली. सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण व मोहन पेंडसे यांनी प्रसंगाधाव राखून नावेतून पाठलाग करुन या मगरीला हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला. सकाळी साडेआठ ते नऊ या वेळेत ही थरारक घटना घडली. मगरीला वेळीच हुसकावल्याने ७० मुले बचावली. 

कृष्णा नदीच्या काठावर दररोज मगरीचे दर्शन होते. तरीही दररोज पोहायला जाणाºयांची संख्या कमी झाली नाही. सध्या ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने पोहायला प्रचंड गर्दी असते. विशेष शाळकरी मुले पोहण्यास शिकायला येत असल्याने गर्दी वाढली आहे. शनिवारी सकाळी साडे आठ वाजता वसंतदादा समाधीस्थळ ते सांगलीवाडी या मार्गावरील नदीकाठी दुतर्फा पोहायला गर्दी होती. वसंतदादांच्या समाधीस्थळापासून १८ फुटी मगरीने अचानक पाण्यात प्रवेश केला. पाण्यातून लपत ती पोहणाऱ्या लहान-मोठ्यांच्या घोळक्यात घुसली. मगर घुसल्याचे समजताच साºयांचा थरकाप उडाला. ‘अरे पळा मगर आली आहे’, असे काहीजणांनी सांगताच अनेकांची घाबरगुंडी उडाली. प्रत्येकजण पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धावाधाव करु लागला. विशेषत: शाळकरी मुले गोंधळून गेली. पाण्यातून बाहेर पडताना अनेकजण पायऱ्यांवर पाय घसरुन पडले. 

पोहणाऱ्यांचा एवढा दंगा सुरु होऊनही मगर जाण्याच्या तयारीत नव्हती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण व मोहन पेंडसे यांनी नाव घेतली. नावेतून त्यांनी मगरीचा पाठलाग केला. बायपास पुलाच्यादिशेकडे मगर पळाली. तेथून ती गायब झाली. तिला वेळीच हुसकावल्याने पोहायला आलेली लहान-मोठी सत्तर मुले बचावली. अर्धातास हा थरार सुरु होता. त्यानंतर पोहणाऱ्यांना मगरीपासून सावध रहावे, असे आवाहन संजय चव्हाण यांनी केले. हरिपूर, विष्णूघाट, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट येथेही पोहणाºयांना मगरीचे दर्शन झाले. या घटनेनंतर अनेकांनी काठावर बसूनही अंघोळ केली. शाळकरी मुलेही काठावरच थांबून राहिली. प्रत्येकाने आरडाओरड करुन मगर आल्याचे सांगितल्याने सर्वजण सावध झाले. 

मगरींचा मुक्कामसांगली, हरिपूर, सांगलीवाडी, पद्माळे, ब्रम्हनाळ, भिलवडी, कसबे डिग्रज, तुंग या नदीकाठच्या मार्गावर गेल्या काही वर्षात मगरींची संख्या व त्यांचा मुक्काम वाढला आहे. मगरींच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. काहीजणांना कायमचे अपंगत्व आले आहे. तरीही वन विभागाकडून या मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी काहीच उपाययोजना आखल्या जात नाहीत. नदीकाठी केवळ ‘मगरीपासून सावध रहावे’, असे फलक लावण्याशिवाय वन विभागाने काहीच केले नाही. मध्यंतरी या विभागाने केलेल्या सर्व्हेंत ९६ पेक्षा जादा मगरी आढळून आल्या होत्या. आता ही संख्या वाढली असण्याची शक्यता आहे.

नदीत दररोज मगरीचे दर्शन होते. पण सध्या ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने लहान मुले मोठ्या प्रमाणात पोहायला शिकण्यासाठी येत आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे. वन विभाग काहीच करीत नसल्याने पालकांनी काळजी घ्यावी. पोहताना आजू-बाजूला लक्ष ठेवावे. आज ज्या मुलांनी प्रत्यक्षात मगर पाहिली आहे, ते उद्या भितीनेपोहायला येत नाहीत. - संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, सांगली.