शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

NCP: राष्ट्रवादीमध्ये वाद हवेत, मग संवाद कार्यक्रम कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 18:37 IST

सांगली : राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत परिवार संवाद कार्यक्रमातून पक्षवाढीचा मंत्र देण्यात आला; मात्र सांगलीत पक्षाचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत ...

सांगली : राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत परिवार संवाद कार्यक्रमातून पक्षवाढीचा मंत्र देण्यात आला; मात्र सांगलीत पक्षाचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी वाद हवे असल्याचे सांगितले. वाद असायला हवेत, तर संवाद यात्रा कशासाठी असा प्रश्न आता सामान्य कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. गटबाजीमुळे होणारी कुचंबणा यापुढेही कायम राहण्याचे संकेत असल्याने पक्षांतर्गत नाराजीचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची चिन्हे आहेत.

सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघ तसेच महापालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांत विभागली गेली आहे. एका गटाच्या कार्यकर्त्याला दुसऱ्या गटाकडून झिडकारले जाते. पदांच्या वाटपातही हे राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शहर जिल्हाध्यक्ष व विधानसभा क्षेत्राध्यक्षांमधील वादाची परंपराही खूप जुनी आहे. सांगली विधानसभा क्षेत्राचे माजी अध्यक्ष दिवंगत कमलाकर पाटील यांनी या गटबाजीवर अनेकदा बंड पुकारले होते. आता उघडपणे या गोष्टी समोर येत नसल्या तरी गटबाजी कायम आहे.सांगलीत परिवार संवाद कार्यक्रमात जयंत पाटील यांनी स्वत: भाषणात अशी तक्रार आपल्याकडे आल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या वादावर त्यांनी शिक्कामोर्तब केले; मात्र दुसरीकडे हे वाद हवेत, असे मतही मांडले. पक्षात सर्व सुरळीत असेल तर दृष्ट लागते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या याच भूमिकेने सध्या पक्षांतर्गत संभ्रम वाढला आहे.

(सांगलीत राष्ट्रवादीची संवाद नव्हे, विसंवाद यात्रा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले..)

सांगली, मिरजेत गेल्या तीन वर्षांत अन्य पक्षातून अनेक दिग्गज पदाधिकारी, नेते राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांनाही या गटबाजीचा त्रास होत आहे. पक्षातील ही गर्दी वाढत असताना वादाची तीव्रताही वाढत आहे. पक्षात मुक्तपणा नसल्याची भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्व बाबींकडे जयंत पाटील दुर्लक्ष करणार का, असा सवालही उपस्थित होतो. अन्य पक्षातून राष्ट्रवादीमध्ये येऊ पाहणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतील या गटबाजीमुळे सावधगिरीची भूमिका घेतल्याचे समजते.

आंदोलनाबाबत कोंडी

कोणत्याही प्रश्नावर एखाद्या पदाधिकायाला आंदोलन करायचे असेल किंवा पत्रकबाजी करायची असेल तर त्याची कल्पनाही ठराविक नेत्यांना द्यावी लागते, अशी खंत काहींनी व्यक्त केली. या समस्या नंतर पक्षासाठी अडचणीच्या ठरू शकतात.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील