शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

NCP: राष्ट्रवादीमध्ये वाद हवेत, मग संवाद कार्यक्रम कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 18:37 IST

सांगली : राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत परिवार संवाद कार्यक्रमातून पक्षवाढीचा मंत्र देण्यात आला; मात्र सांगलीत पक्षाचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत ...

सांगली : राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत परिवार संवाद कार्यक्रमातून पक्षवाढीचा मंत्र देण्यात आला; मात्र सांगलीत पक्षाचे नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी वाद हवे असल्याचे सांगितले. वाद असायला हवेत, तर संवाद यात्रा कशासाठी असा प्रश्न आता सामान्य कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. गटबाजीमुळे होणारी कुचंबणा यापुढेही कायम राहण्याचे संकेत असल्याने पक्षांतर्गत नाराजीचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची चिन्हे आहेत.

सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघ तसेच महापालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांत विभागली गेली आहे. एका गटाच्या कार्यकर्त्याला दुसऱ्या गटाकडून झिडकारले जाते. पदांच्या वाटपातही हे राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शहर जिल्हाध्यक्ष व विधानसभा क्षेत्राध्यक्षांमधील वादाची परंपराही खूप जुनी आहे. सांगली विधानसभा क्षेत्राचे माजी अध्यक्ष दिवंगत कमलाकर पाटील यांनी या गटबाजीवर अनेकदा बंड पुकारले होते. आता उघडपणे या गोष्टी समोर येत नसल्या तरी गटबाजी कायम आहे.सांगलीत परिवार संवाद कार्यक्रमात जयंत पाटील यांनी स्वत: भाषणात अशी तक्रार आपल्याकडे आल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या वादावर त्यांनी शिक्कामोर्तब केले; मात्र दुसरीकडे हे वाद हवेत, असे मतही मांडले. पक्षात सर्व सुरळीत असेल तर दृष्ट लागते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या याच भूमिकेने सध्या पक्षांतर्गत संभ्रम वाढला आहे.

(सांगलीत राष्ट्रवादीची संवाद नव्हे, विसंवाद यात्रा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले..)

सांगली, मिरजेत गेल्या तीन वर्षांत अन्य पक्षातून अनेक दिग्गज पदाधिकारी, नेते राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांनाही या गटबाजीचा त्रास होत आहे. पक्षातील ही गर्दी वाढत असताना वादाची तीव्रताही वाढत आहे. पक्षात मुक्तपणा नसल्याची भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्व बाबींकडे जयंत पाटील दुर्लक्ष करणार का, असा सवालही उपस्थित होतो. अन्य पक्षातून राष्ट्रवादीमध्ये येऊ पाहणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतील या गटबाजीमुळे सावधगिरीची भूमिका घेतल्याचे समजते.

आंदोलनाबाबत कोंडी

कोणत्याही प्रश्नावर एखाद्या पदाधिकायाला आंदोलन करायचे असेल किंवा पत्रकबाजी करायची असेल तर त्याची कल्पनाही ठराविक नेत्यांना द्यावी लागते, अशी खंत काहींनी व्यक्त केली. या समस्या नंतर पक्षासाठी अडचणीच्या ठरू शकतात.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील