शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

महिला पोलिस नसल्याने पाणी नाही

By admin | Published: January 09, 2017 12:31 AM

आटपाडीत ‘पाटबंधारे’चा हास्यास्पद खुलासा : शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग

अविनाश बाड ल्ल आटपाडी‘अहो, महिला पोलिस आटपाडीत उपलब्ध नाहीत, म्हणून आम्ही तलावातील पाणी शेतीला सोडू शकत नाही..!’ आटपाडीतील शेतकऱ्यांना गेले २० दिवस पाटबंधारे विभागाचे अधिकारी असे हास्यास्पद उत्तर देऊन त्यांची कुचेष्टा करीत आहेत. गेली २१ वर्षे दुष्काळग्र्रस्तांनी अनेक आंदोलने केल्यानंतर, तलावात आलेल्या टेंभूच्या पाण्याने शेतात पिके डोलण्याऐवजी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग सुरू केला आहे.बनपुरी (ता. आटपाडी) गावाजवळ कचरेवस्ती तलाव आहे. या तलावात सोडलेले टेंभू योजनेचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या ज्वारीच्या पिकाला फुकट नव्हे, तर रितसर पाणीपट्टीची रक्कम भरून घेऊन मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पाटबंधारे विभागाने पाणी सोडलेही होते. पण तलावाच्या परिसरात असलेल्या काही शेतकऱ्यांनी दि. १६ डिसेंबरपासून पाणी बंद करून खाली पाणी सोडण्यास नकार दिला आहे. त्यांचे म्हणणे असे की, पुन्हा तलावात कधी पाणी सोडणार, हे नक्की नाही आणि पुन्हा टेंभूचे पाणी तलावात सोडले नाही, तर पाणीटंचाई निर्माण होईल. भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याऐवजी भले आम्हाला तुरुंगात टाका, अशी टोकाची भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यांची भीती आणि पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार पाहता, अनाठायी नसली तरी, त्यांना वस्तुस्थिती सांगून त्यांची समजूत घालण्याऐवजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग करीत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.या तलावाची पाणी साठवण क्षमता ५५.८३ दशलक्ष घनफूट असून, सध्या ३२.८३ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा वापरण्यायोग्य आहे. यापैकी आरक्षित पाणीसाठा ठेवून उर्वरित पाणी ज्वारीच्या वाळून चाललेल्या पिकाला तात्काळ द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण पाटबंधारे विभाग वेळकाढूपणाची भूमिका घेताना दिसत आहे. गेल्या २० दिवसात अधिकाऱ्यांनी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना वस्तुस्थिती सांगून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामध्ये यश येत नाही, तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पोलिस बंदोबस्त घेऊनही पाणी सोडले नाही. २० दिवस शेतकरी पाटबंधारे कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. पिके वाळून चालली आहेत.या पार्श्वभूमीवर शुक्र्रवारी (दि. ६ जानेवारी) रोजी जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली येथील पाटबंधारे कार्यालयात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पण अधिकाऱ्यांनी पाणी न सोडण्याचे एकमेव कारण हे महिला पोलिस उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. वास्तविक ही जबाबदारी पोलिसांची आहे. उपविभागीय अभियंता तानाजी माळी यांच्यासमोर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर देढे यांनी, ‘तुम्ही तारीख सांगा, बंदोबस्त देण्याची जबाबदारी आमची आहे’, असे आंदोलकांसमोर सांगितले. त्यामुळे पाटबंधारे विभाग वेळकाढूपणा का करीत आहे, हे समजणे कठीण आहे. शिवाय दोन्हीही बाजूच्या शेतकऱ्यांत गैरसमज पसरवून त्यांच्यात भांडणे लावण्याचा उद्योग करीत आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.आम्ही सोडतो : तुम्ही बंद करा!शेतकऱ्यांनी दबाव वाढविल्यावर अधिकारी तलावावर गेले आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणाले, ‘आम्ही पाणी सोडतो, आम्ही इथून गेलो की मागे तुम्ही बंद करा!’ शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या साक्षीनेच असा आरोप केला. कचरेवस्ती तलावातील १६ दशलक्ष घनफूट पाण्याचे पिण्यासाठी आरक्षण असल्याचे शाखा अभियंता व्ही. आर. केंगार यांनी सांगितले, तर उपविभागीय अभियंता तानाजी माळी यांनी २५ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केल्याचे सांगून, सावळा गोंधळ स्पष्ट केला.