शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भिडेंची शेतीच नाही, आंबा देणार कोठून? नितीन चौगुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 18:17 IST

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.

मित्राचा किस्सा बोलून दाखविला; माध्यमांकडून विपर्यास

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. भिंडेंची शेतीच नाही, ते औषधी आंबा देणार कोठून? त्यांच्या मित्राने शेतात लावलेल्या आंब्यामुळे अनेक महिलांना पुत्रप्राप्ती झाल्याचा किस्सा बोलून दाखविला होता. तो भिडेंनी सांगितला. पण माध्यमांनी भिडेच असे बोलल्याचे दाखवून त्यांची बदनामी केली आहे, असेही चौगुले यांनी सांगितले. भिडे यांनी नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी ‘माझ्या शेतातीत आंबा खाल्ल्याने महिलांना पुत्रप्राप्ती होते. आतापर्यंत १८० महिलांना या आंब्याचा गुण आला आहे’, असा दावा केल्याचे वृत्त प्रसारमाध्यामांनी प्रसिद्ध केले होते. भिडेंच्या या विधानाचा अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी खरपूस समाचार घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. सोशल मीडियावरुनही या विधानाची खिल्ली उडविण्यात आली. अजूनही सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे. त्यामुळे चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. नाशिकच्या सभेत भिडे काय बोलले, माध्यमांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास कसा केला, याची माहिती त्यांनी यावेळी दिली. चौगुले म्हणाले, भिडे यांंना मांजर्डे येथील त्यांचे परिचित मोहनराव शिवाजीराव मोहिते हे तब्बल ३५ वर्षांनी भेटले. त्यांच्यात गप्पा रंगत गेल्या. त्यावेळी मोहिते यांनी भिडेंना सांगितले की, मला फळबाग शेतीची खूप आवड आहे. मी धाराशीव जिल्ह्यात गेलो होती. तिथे मला आंब्याच्या ११० प्रकारच्या जाती आढळून आल्या. भगवंताच्या कृपेने मला एक कोय मिळाली. या कोयीचं रोपटं करुन ते झाड वाढवलं. ते आंब्याचं झाड माझ्याजवळ आहे. त्याची काय महती आहे, ती सांगतो तुम्हाला. अहो! लग्न होऊन दहा-बारा वर्षे होऊनसुद्धा ज्यांना पोरं होत नाहीत, अशा पती-पत्नींनी या झाडाचा आंबा खाल्ला, तर त्यांना निश्चित पोरं होतात. मी आतापर्यंत १८० दाम्पत्यांना हे आंबे खायला दिलेत. यातील दीडशेपेक्षा जास्तजणांना मुलं झाली आहेत. ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल, असा हा वंध्यत्वावरचा गुणकारी आंबा आहे. 

चौगुले पुढे म्हणाले, मोहिते यांनी जो किस्सा सांगितला, तोच भिडेंनी नाशिकच्या सभेत कथन केला. अडीच तास त्यांचे भाषण सुरु राहिले. पण माध्यमांनी नेमके त्यांचे आंब्याच्याबाबतीतील तीन मिनिटांचे विधानच प्रसिद्ध केले, तेही खोटे. ज्या प्रसारमाध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केले आहे, त्यांनी भिडेंची माफी मागावी. अन्यथा आम्ही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू. 

म्हणून आंब्याचा दिला दाखला...चौगुले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे एक आम्रवृक्षच आहेत. त्यांच्याकडे महामृत्युंजय मंत्र, महासंजीवनी मंत्र, महाअमृत मंत्र होता. या अमृताचे आजच्या पिढीने प्राशन केले, तर हा हिंदू समाज छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या रक्त गटाचा बनेल, असेही भिडे यांनी नाशिकच्या सभेत नमूद केले होते. यासाठी त्यांनी मोहिते यांच्या शेतातील आंब्याचे उदाहरण दिले होते. 

शेतीच नाही : बदनामीचा डावचौगुले म्हणाले, भिडे यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतले आहे. ते बालब्रम्हचारी व संन्याशी आहेत. सांगलीत गावभागात एका कार्यकर्त्याने दिलेल्या दहा-बाय-दहाच्या खोलीत ते राहतात. अंथरुण-पांघरुणही नाही. फरशीवर झोपतात आणि धोतर अंगावर घेतात. त्यांची कुठेही मालमत्ता अथवा शेती नाही. मग त्यांची आंब्याची बाग कशी असेल? प्रसारमाध्यमांना त्यांच्याविषयी सर्व माहिती आहे. तरीही त्यांच्या विधानाचा विपर्यास करुन खोटे वृत्त प्रसिद्ध केले. गेल्या दोन वर्षापासून समाजविघातक शक्ती भिडे यांच्या बदनामीचा डाव आखत आहेत. कोरेगाव-भीमा येथील दंगलीत त्यांना अडकविण्यात आले. पुण्यात वारीमध्ये शिवप्रतिष्ठानचे धारकरी तलवारी घेऊन घुसल्याचा आरोप करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBhima-koregaonभीमा-कोरेगावShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaj Thackerayराज ठाकरे