शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

भिडेंची शेतीच नाही, आंबा देणार कोठून? नितीन चौगुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 18:17 IST

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.

मित्राचा किस्सा बोलून दाखविला; माध्यमांकडून विपर्यास

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. भिंडेंची शेतीच नाही, ते औषधी आंबा देणार कोठून? त्यांच्या मित्राने शेतात लावलेल्या आंब्यामुळे अनेक महिलांना पुत्रप्राप्ती झाल्याचा किस्सा बोलून दाखविला होता. तो भिडेंनी सांगितला. पण माध्यमांनी भिडेच असे बोलल्याचे दाखवून त्यांची बदनामी केली आहे, असेही चौगुले यांनी सांगितले. भिडे यांनी नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी ‘माझ्या शेतातीत आंबा खाल्ल्याने महिलांना पुत्रप्राप्ती होते. आतापर्यंत १८० महिलांना या आंब्याचा गुण आला आहे’, असा दावा केल्याचे वृत्त प्रसारमाध्यामांनी प्रसिद्ध केले होते. भिडेंच्या या विधानाचा अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी खरपूस समाचार घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. सोशल मीडियावरुनही या विधानाची खिल्ली उडविण्यात आली. अजूनही सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे. त्यामुळे चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. नाशिकच्या सभेत भिडे काय बोलले, माध्यमांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास कसा केला, याची माहिती त्यांनी यावेळी दिली. चौगुले म्हणाले, भिडे यांंना मांजर्डे येथील त्यांचे परिचित मोहनराव शिवाजीराव मोहिते हे तब्बल ३५ वर्षांनी भेटले. त्यांच्यात गप्पा रंगत गेल्या. त्यावेळी मोहिते यांनी भिडेंना सांगितले की, मला फळबाग शेतीची खूप आवड आहे. मी धाराशीव जिल्ह्यात गेलो होती. तिथे मला आंब्याच्या ११० प्रकारच्या जाती आढळून आल्या. भगवंताच्या कृपेने मला एक कोय मिळाली. या कोयीचं रोपटं करुन ते झाड वाढवलं. ते आंब्याचं झाड माझ्याजवळ आहे. त्याची काय महती आहे, ती सांगतो तुम्हाला. अहो! लग्न होऊन दहा-बारा वर्षे होऊनसुद्धा ज्यांना पोरं होत नाहीत, अशा पती-पत्नींनी या झाडाचा आंबा खाल्ला, तर त्यांना निश्चित पोरं होतात. मी आतापर्यंत १८० दाम्पत्यांना हे आंबे खायला दिलेत. यातील दीडशेपेक्षा जास्तजणांना मुलं झाली आहेत. ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल, असा हा वंध्यत्वावरचा गुणकारी आंबा आहे. 

चौगुले पुढे म्हणाले, मोहिते यांनी जो किस्सा सांगितला, तोच भिडेंनी नाशिकच्या सभेत कथन केला. अडीच तास त्यांचे भाषण सुरु राहिले. पण माध्यमांनी नेमके त्यांचे आंब्याच्याबाबतीतील तीन मिनिटांचे विधानच प्रसिद्ध केले, तेही खोटे. ज्या प्रसारमाध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केले आहे, त्यांनी भिडेंची माफी मागावी. अन्यथा आम्ही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू. 

म्हणून आंब्याचा दिला दाखला...चौगुले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे एक आम्रवृक्षच आहेत. त्यांच्याकडे महामृत्युंजय मंत्र, महासंजीवनी मंत्र, महाअमृत मंत्र होता. या अमृताचे आजच्या पिढीने प्राशन केले, तर हा हिंदू समाज छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या रक्त गटाचा बनेल, असेही भिडे यांनी नाशिकच्या सभेत नमूद केले होते. यासाठी त्यांनी मोहिते यांच्या शेतातील आंब्याचे उदाहरण दिले होते. 

शेतीच नाही : बदनामीचा डावचौगुले म्हणाले, भिडे यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतले आहे. ते बालब्रम्हचारी व संन्याशी आहेत. सांगलीत गावभागात एका कार्यकर्त्याने दिलेल्या दहा-बाय-दहाच्या खोलीत ते राहतात. अंथरुण-पांघरुणही नाही. फरशीवर झोपतात आणि धोतर अंगावर घेतात. त्यांची कुठेही मालमत्ता अथवा शेती नाही. मग त्यांची आंब्याची बाग कशी असेल? प्रसारमाध्यमांना त्यांच्याविषयी सर्व माहिती आहे. तरीही त्यांच्या विधानाचा विपर्यास करुन खोटे वृत्त प्रसिद्ध केले. गेल्या दोन वर्षापासून समाजविघातक शक्ती भिडे यांच्या बदनामीचा डाव आखत आहेत. कोरेगाव-भीमा येथील दंगलीत त्यांना अडकविण्यात आले. पुण्यात वारीमध्ये शिवप्रतिष्ठानचे धारकरी तलवारी घेऊन घुसल्याचा आरोप करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBhima-koregaonभीमा-कोरेगावShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaj Thackerayराज ठाकरे