शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

..तर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला लावतील - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:32 IST

मस्साजोग सरपंचांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू

सांगली : मस्साजोग (जि. बीड)चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास समर्थ आहेत. त्यांना जर वाटले की, या प्रकरणात काही तथ्य आहे, तर ते ताबडतोब मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगतील, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले.चंद्रकांत पाटील म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिस यंत्रणा चौकशी करत आहे. एसआयटी नेमण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. वाल्मीक कराड याच्यासह आरोपींना ‘मकोका’ लावण्यापर्यंत, तसेच वाल्मीक कराड याची संपत्ती जप्त करण्यापर्यंतची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. वाल्मीक कराड याला देखील ३०२ च्या गुन्ह्यात घेतील. मस्साजोग प्रकरणात कुणीही दोषी असले, तरी त्यांना मुख्यमंत्री सोडणार नाहीत.

..अन्यथा मीच रस्त्यावर उतरेनसांगली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी फार मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जे लोक ड्रग्जसंबंधी माहिती देतील. त्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त केला, तर माझ्या सॅलरी अकाउंटमधून १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. ड्रग्जची कारवाई केली जातेच. नाही झाली, तरी मी रस्त्यावर उतरेन, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.

जतचा दुष्काळ संपेलदुष्काळामुळे जत तालुक्यात पिण्याचे आणि शेतीचे पाणी पुरेसे मिळत नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तेथील नागरिक कर्नाटकामध्ये जाण्यास इच्छुक होते, परंतु आता टेंभू, म्हैसाळ योजनेतून जत तालुक्याला प्रत्येक कानाकोपऱ्यात तलावात पाणी पोहोचण्याचे काम ६० टक्के झाले आहे. जत तालुक्यातील १०० टक्के दुष्काळ लवकरच संपेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारशी चर्चा करावीचंद्रकांत पाटील म्हणाले, १८०० विद्यार्थ्यांनी केंद्राच्या ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटवर प्रवेश घेतला आहे. केंद्रात ईडब्ल्यूएस आहे. पण, महाराष्ट्रात मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिल्यानंतर ईडब्ल्यूएसमध्ये राहता येत नाही. परंतु, तरीही त्या विद्यार्थ्यांना या वर्षापुर्ते केंद्राचे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मान्य करून प्रवेश दिला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी आता मुंबईत येणे सुरू केले पाहिजे, तसेच शिष्टमंडळासह निवेदन घेऊन चर्चेला आले पाहिजे व येताना कायदेशीर बाजू माहिती असणारीच लोकं आणली पाहिजेत.

पालकमंत्री पदाचा वाद मिटेलजिवंत माणसांमध्ये रुसवे-फुगवे असतात. कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुसवे-फुगवे संपवतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस