शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

..तर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला लावतील - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:32 IST

मस्साजोग सरपंचांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू

सांगली : मस्साजोग (जि. बीड)चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास समर्थ आहेत. त्यांना जर वाटले की, या प्रकरणात काही तथ्य आहे, तर ते ताबडतोब मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगतील, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले.चंद्रकांत पाटील म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिस यंत्रणा चौकशी करत आहे. एसआयटी नेमण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. वाल्मीक कराड याच्यासह आरोपींना ‘मकोका’ लावण्यापर्यंत, तसेच वाल्मीक कराड याची संपत्ती जप्त करण्यापर्यंतची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. वाल्मीक कराड याला देखील ३०२ च्या गुन्ह्यात घेतील. मस्साजोग प्रकरणात कुणीही दोषी असले, तरी त्यांना मुख्यमंत्री सोडणार नाहीत.

..अन्यथा मीच रस्त्यावर उतरेनसांगली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी फार मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जे लोक ड्रग्जसंबंधी माहिती देतील. त्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त केला, तर माझ्या सॅलरी अकाउंटमधून १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. ड्रग्जची कारवाई केली जातेच. नाही झाली, तरी मी रस्त्यावर उतरेन, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.

जतचा दुष्काळ संपेलदुष्काळामुळे जत तालुक्यात पिण्याचे आणि शेतीचे पाणी पुरेसे मिळत नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तेथील नागरिक कर्नाटकामध्ये जाण्यास इच्छुक होते, परंतु आता टेंभू, म्हैसाळ योजनेतून जत तालुक्याला प्रत्येक कानाकोपऱ्यात तलावात पाणी पोहोचण्याचे काम ६० टक्के झाले आहे. जत तालुक्यातील १०० टक्के दुष्काळ लवकरच संपेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारशी चर्चा करावीचंद्रकांत पाटील म्हणाले, १८०० विद्यार्थ्यांनी केंद्राच्या ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटवर प्रवेश घेतला आहे. केंद्रात ईडब्ल्यूएस आहे. पण, महाराष्ट्रात मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिल्यानंतर ईडब्ल्यूएसमध्ये राहता येत नाही. परंतु, तरीही त्या विद्यार्थ्यांना या वर्षापुर्ते केंद्राचे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मान्य करून प्रवेश दिला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी आता मुंबईत येणे सुरू केले पाहिजे, तसेच शिष्टमंडळासह निवेदन घेऊन चर्चेला आले पाहिजे व येताना कायदेशीर बाजू माहिती असणारीच लोकं आणली पाहिजेत.

पालकमंत्री पदाचा वाद मिटेलजिवंत माणसांमध्ये रुसवे-फुगवे असतात. कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुसवे-फुगवे संपवतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस