शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दोन वर्षांत सोडविणार, माजी मंत्री जयंत पाटलांनी दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 16:56 IST

बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचाही त्यांचा उद्देश आहे. अशा काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ही संस्था आपल्या ताब्यात असणे गरजेचे

जत : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार सहकाराच्या नियमात आणि घटनेत बदल करत आहे. बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचाही त्यांचा उद्देश आहे. अशा काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ही संस्था आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे. यासाठी सांगली बाजार समितीत महाविकास आघाडीच्या वसंतदादा शेतकरी पॅनलकडे एकहाती सत्ता द्या, असे आवाहन करत जतच्या वंचित गावांचा पाणीप्रश्न येत्या दाेन वर्षात सोडवू, अशी ग्वाही माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी साेमवारी दिली.दरिकोणूर (ता. जत) येथे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते. यावेळी आमदार विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत, जयश्रीताई पाटील, अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती.जयंत पाटील म्हणाले, सांगली बाजार समितीच्या उमेदवारीबाबत काही लाेक नाराज झाले असले तरी त्यांनी पक्षासाठी आणि भाजपाच्या विचाराला बाजूला सारण्यासाठी एकत्र राहणे गरजेचे आहे. जत तालुक्यासाठी आम्ही सर्वात जास्त जागा दिल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी येथे एकदिलाने काम करत आहे. येणाऱ्या काळात जतच्या ६५ गावांना पाणी मिळणार आहे. मी मंत्री असताना सहा टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे. पण, दुर्दैवाने सरकार गेल्याने ही योजना पूर्ण झाली नाही.आता सत्ताधारी सरकारने योजनेला मंजुरी दिली आहे, पण कामाला सुरुवात नाही. तरीही येत्या अडीच वर्षात जतच्या शिवारात पाणी आणण्याची जबाबदारी मी व विश्वजित कदम यांनी घेतली आहे. पाणी आल्यानंतर सर्वात जास्त फायदा जतला होणार आहे. यासाठी बाजार समितीही आपल्या ताब्यात असायला हवी.सभेस सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, सरदार पाटील, रमेश पाटील, सुरेश पाटील, आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, सुजयनाना शिंदे, स्वप्नील शिंदे, बसवराज बिराजदार, पिराप्पा माळी, गणी मुल्ला, अमिन शेख, मच्छिंद्र वाघमोडे यांच्यासह संख, जाडर बोबलाद, दरिबडची, मुचंडी या चार जिल्हा परिषद गटातील सोसायटी व ग्रामपंचायत गटाचे मतदार, उमेदवार उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपा