शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

कृष्णेच्या सांगली बंधाऱ्यावरून वाहतेय वादाचे पाणी; राजकीय, तज्ञ लोकांमध्येही एकमत दिसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 17:23 IST

म्हैसाळला नवा बंधारा बांधल्यानंतर तिथून सांगलीपर्यंतच्या पात्रात दर उन्हाळ्यात जादा पाणी साठवून ठेवावे लागेल. त्याचे मोजमाप समजू शकलेले नाही.

अविनाश कोळी

सांगली : कृष्णा नदीचा सांगलीतील बंधारा काढून म्हैसाळमध्ये नवा बंधारा उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात आला असताना यावरून मतभेदांचे पाणी पुलाखालून वाहू लागले आहे. जलसंपदा मंत्र्यांनी हा प्रस्ताव अभ्यासाअंती सादर झाल्याचे स्पष्ट केले असले, तरी शहरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी हा अभ्यास जनतेसमोर मांडण्याची मागणी केली आहे.

सांगलीतील कृष्णा नदीचे पात्र दरवर्षी उन्हाळ्यात कोरडे पडते. गेल्या पाच वर्षांचा अपवाद वगळता नेहमी उन्हाळ्यात धरणातून पाणी सोडून ते सांगलीतील बंधाऱ्यापर्यंत साठवावे लागते. तेव्हाच सांगली, कुपवाड परिसराला पाणीपुरवठा होतो. काहीवेळा जिथून उपसा केला जातो, तिथे खोल खड्डा खणून पाणी साठवावे लागते. ही वस्तुस्थिती असताना सांगलीतील नदीतला बंधारा हटविल्यास उन्हाळ्यात सांगलीकरांना पाणी कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेचे काही निवृत्त पाणीपुरवठा अभियंता, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा प्रस्ताव अभ्यासाअंती तयार झाल्याचे सांगितले होते. म्हैसाळ बंधाऱ्यापासून सांगलीपर्यंत उन्हाळ्यातही पाणी साठवण होऊ शकते, अशी खात्री पाटबंधारे अधिकारी व मंत्री देत आहेत. हा अभ्यास किंवा त्याबाबतचा सर्वेक्षण अहवाल अद्याप खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे संभ्रमाची घाण या बंधाऱ्यात अडकली आहे.

म्हैसाळपासून सांगलीपर्यंत किती पाणी हवे

म्हैसाळला नवा बंधारा बांधल्यानंतर तिथून सांगलीपर्यंतच्या पात्रात दर उन्हाळ्यात जादा पाणी साठवून ठेवावे लागेल. त्याचे मोजमाप समजू शकलेले नाही.

पुराची तीव्रता कितपत कमी होणार

सांगलीचा बंधारा काढून म्हैसाळला केल्यानंतर महापुराची तीव्रता किती कमी होणार, याचा अभ्यास अद्याप झालेला् नाही. जयंत पाटील यांनी काही प्रमाणातच याचा फायदा होईल, असे सांगितले होते.

सांगलीचा बंधारा काढण्याची आवश्यकता का आहे? सांगली, कुपवाड व आसपासच्या गावांच्या उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम कसा होणार नाही, या प्रश्नांची तांत्रिकदृष्ट्या मजबूत उत्तरे देऊन खुला परिसंवाद जलसंपदा विभागाने घ्यावा. - सतीश साखळकर, सामाजिक कार्यकर्ते 

म्हैसाळमध्ये नवा बंधारा उभारण्याचा व सांगलीतील हटविण्याबाबत परिपूर्ण अभ्यास झाला आहे. सांगली, कुपवाडला पाण्याची समस्या उद्भवणार नाही. - मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, सांगली

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी