शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

FRP Price : ठाकरे सरकारला गुडघे टेकायला लावू; स्वाभिमानी संघटनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 14:24 IST

सरकारमधील आमदार आणि मंत्रीही दोन टप्प्यांत मानधन घेतात का? हा देखील प्रश्न आहे

सांगली : दोन टप्प्यांत एफआरपी देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला हिसका दाखवू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. दोन टप्प्यांत एफआरपीची घोषणा शासनाने काल, सोमवारी केली. सरकारच्या या निर्णयावरुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

खराडे म्हणाले, हा निर्णय शेतकऱ्यांना मातीत गाडणारा आहे. साखर सम्राटांच्या दबावापोटी ठाकेर सरकारने निर्णय घेतला आहे. साखर सम्राट नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करत आले आहेत. दोन टप्प्यांत एफआरपीच्या निर्णयामुळे त्यांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. त्याचा गैरफायदा घेत कदाचित तीन ते चार टप्प्यांतही एफआरपी दिली जाण्याचा धोका आहे. काही कारखानदार देणारही नाहीत, त्यामुळे हा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा.खराडे म्हणाले, ज्या शासकीय समितीच्या शिफारशीने हा निर्णय घेतला आहे, ते सरकारी अधिकारी दोन टप्प्यांत पगार घ्यायला तयार होतील का? असा प्रश्न आहे. सातव्या वेतन आयोगासह एकाच टप्प्यात भरभक्कम पगार घेणाऱ्यांना शेतकऱ्याची दुखणी कळणार नाहीत. सरकारमधील आमदार आणि मंत्रीही दोन टप्प्यांत मानधन घेतात का हादेखील प्रश्न आहे.बेदाणा उत्पादकांना २३ दिवसानंतर पैसे, द्राक्ष उत्पादकांना गंडा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अडतवाल्याकडून फसवणूक, दूध उत्पादकांना दहा दिवसानंतर पैसे अशी शेतकऱ्याची लुटमार सुरु आहे. त्याला कोणी वालीच नाही अशी स्थिती आहे. या स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यामागे भक्कमपणे उभे रहायला हवे. याउलट शेतकरीविरोधी निर्णय घेतले जात आहेत, हे दुदैव आहे.सरकारने हा निर्णय तातडीने मागे  घेतला नाही, तर रस्त्यावरची आरपारची लढाई लढावी लागेल. दिल्लीत सरकारला शेतकऱ्यांनी गुडघे टेकायला भाग पाडले, त्याचप्रमाणे ठाकरे सरकारलाही गुडघे टेकायला भाग पाडू.

टॅग्स :SangliसांगलीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने