शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

FRP Price : ठाकरे सरकारला गुडघे टेकायला लावू; स्वाभिमानी संघटनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 14:24 IST

सरकारमधील आमदार आणि मंत्रीही दोन टप्प्यांत मानधन घेतात का? हा देखील प्रश्न आहे

सांगली : दोन टप्प्यांत एफआरपी देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला हिसका दाखवू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. दोन टप्प्यांत एफआरपीची घोषणा शासनाने काल, सोमवारी केली. सरकारच्या या निर्णयावरुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

खराडे म्हणाले, हा निर्णय शेतकऱ्यांना मातीत गाडणारा आहे. साखर सम्राटांच्या दबावापोटी ठाकेर सरकारने निर्णय घेतला आहे. साखर सम्राट नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करत आले आहेत. दोन टप्प्यांत एफआरपीच्या निर्णयामुळे त्यांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. त्याचा गैरफायदा घेत कदाचित तीन ते चार टप्प्यांतही एफआरपी दिली जाण्याचा धोका आहे. काही कारखानदार देणारही नाहीत, त्यामुळे हा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा.खराडे म्हणाले, ज्या शासकीय समितीच्या शिफारशीने हा निर्णय घेतला आहे, ते सरकारी अधिकारी दोन टप्प्यांत पगार घ्यायला तयार होतील का? असा प्रश्न आहे. सातव्या वेतन आयोगासह एकाच टप्प्यात भरभक्कम पगार घेणाऱ्यांना शेतकऱ्याची दुखणी कळणार नाहीत. सरकारमधील आमदार आणि मंत्रीही दोन टप्प्यांत मानधन घेतात का हादेखील प्रश्न आहे.बेदाणा उत्पादकांना २३ दिवसानंतर पैसे, द्राक्ष उत्पादकांना गंडा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अडतवाल्याकडून फसवणूक, दूध उत्पादकांना दहा दिवसानंतर पैसे अशी शेतकऱ्याची लुटमार सुरु आहे. त्याला कोणी वालीच नाही अशी स्थिती आहे. या स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यामागे भक्कमपणे उभे रहायला हवे. याउलट शेतकरीविरोधी निर्णय घेतले जात आहेत, हे दुदैव आहे.सरकारने हा निर्णय तातडीने मागे  घेतला नाही, तर रस्त्यावरची आरपारची लढाई लढावी लागेल. दिल्लीत सरकारला शेतकऱ्यांनी गुडघे टेकायला भाग पाडले, त्याचप्रमाणे ठाकरे सरकारलाही गुडघे टेकायला भाग पाडू.

टॅग्स :SangliसांगलीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने