शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

दिल्लीतील सत्ताधीशाकडून देश तोडण्याचे काम, योगेंद्र यादवांची भाजप सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 1:30 PM

कोरोनामुळे देशातील ९७ टक्के कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या उलट देशातील एका उद्योगपतीची संपत्ती मात्र वाढत गेली.

सांगली : दिल्लीत खुर्चीत बसलेले लोक देश तोडण्याचे काम करीत आहेत. देशात बलात्कार, खून करण्याचा सन्मान होत आहे. महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त असताना राज्यकर्ते धर्माधर्मांत भांडणे लावण्याचा उद्योग करीत असल्याची टीका स्वराज इंडियाचे संस्थापक शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी सांगलीत केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशात बदल घडत आहे. या यात्रेला समर्थन द्या, असे आवाहनही त्यांनी केले. सांगलीतील स्टेशन चौकात नफरत छोडो, भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ जनसंवाद यात्रा झाली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादीचे प्रा. पद्माकर जगदाळे, शिवसेनेचे शंभुराज काटकर, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, नगरसेवक मंगेश चव्हाण, मयूर पाटील, तौफिक शिकलगार, फिरोज पठाण उपस्थित होते. प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर समन्वयक ललित बाबर यांनी भारत जोडो यात्रेची माहिती दिली.

यादव म्हणाले की, गेल्या चार ते पाच वर्षांत देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. पण त्याची प्रसारमाध्यमात चर्चा होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातही हे मुद्दे नसतात. दिल्लीतील राज्यकर्ते या मुद्दयांपासून जनतेला भटकविण्यासाठी हिंदू-मुस्लीम करीत असतात. भारत मातेच्या दोन्ही सुपुत्रात भांडणे लावण्याचा उद्योग भाजप करीत आहेत. देशात बलात्कार, खून करणाऱ्यांचा सन्मान होत आहे. संविधान, लोकशाहीची मूल्ये नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या साऱ्याविरोधात राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा परिणाम दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आता देशात महागाई, बेरोजगारी दिसू लागली आहे. देशातील सध्याची परिस्थती बदलण्यासाठी जात, धर्म, पक्ष विसरून रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मराठा सेवा संघाचे प्रा. संजय पाटील, ॲड. अजित सूर्यवंशी, ॲड. के. डी. शिंदे, नितीन चव्हाण, करीम मेस्त्री यांच्यासह स्वराज इंडियाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योगपती मित्राची भरभराट

कोरोनामुळे देशातील ९७ टक्के कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या उलट देशातील एका उद्योगपतीची संपत्ती मात्र वाढत गेली. लाॅकडाऊन सुरू झाला तेव्हा त्यांची संपत्ती ६६ हजार कोटी होती. आज ती १२ लाख कोटी इतकी आहे. दोन वर्षांत १८ टक्के वाढ झाली. हे उद्योगपती कोणाचे मित्र आहेत, हे देशाला माहीत असल्याचे सांगत यादव यांनी पंतप्रधानांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

टॅग्स :SangliसांगलीYogendra Yadavयोगेंद्र यादवNarendra Modiनरेंद्र मोदी