शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

'विधानसभा' शाबूत ठेवण्यासाठी 'लोकसभेला' तडजोडी; ‘सेटलमेंट’च्या राजकारणाने सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला

By हणमंत पाटील | Updated: March 18, 2024 16:08 IST

सांगलीचा दबदबा कुठे गेला..

हणमंत पाटीलसांगली : आपला विधानसभा मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी लोकसभेला तडजोडी (सेटलमेंट) करण्याचा फंडा जिल्ह्याच्या राजकारणात ३५ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत खासदार म्हणून कणखर नेतृत्व तयार न झाल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा शाबूत ठेवण्यासाठी जिल्ह्यात चालणाऱ्या तडजोडीच्या राजकारणाचा घेतलेला मागोवा..

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे माजी आ. विलासराव जगताप यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या सेटलमेंटवरून तोंड उघडले. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, कडेगाव-पलूस, खानापूर-आटपाडी, तासगाव-कवठेमहांकाळ व सांगली विधानसभा मतदारसंघात मागील ३० ते ४५ वर्षांपासून सुरू असलेली ठराविक नेत्यांच्या घराणेशाहीवर आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.

प्रत्येक लोकसभा निवडणुकीत खासदार होण्यासाठी इच्छुक उमेदवारासोबत आमचा विधानसभा मतदारसंघ सोडवून घेण्याचे तडजोडीचे राजकारण केले जाते. निवडून येणाऱ्या खासदाराने आमच्या विधानसभा मतदारसंघात हस्तक्षेप करायचा नाही, हे राजकारण जिल्हापातळीवरील नेतृत्व व विकासाला मारक ठरत आहे. सांगली जिल्ह्यातील मतदारांनी आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी लोकसभा निवडणुकीत गांभीर्याने व अधिक सजगतेने मतदान करावे. तरच जिल्ह्याच्या विकासाला मारक ठरणाऱ्या तडजोडीच्या राजकारणाला सुरुंग लागेल.

सांगलीचा दबदबा कुठे गेला..देशाच्या स्वातंत्र्यानंतर सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्यापासून राज्याच्या राजकारणावर सांगलीचा दबदबा होता. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत हा दबदबा कायम होता. तो काही प्रमाणात पुढे डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील व आर. आर. पाटील यांनी कायम ठेवला. तरीही पुढे सोयीच्या राजकारणाने आपल्या जिल्ह्यातील राजस्तरीय नेत्याला रोखण्यासाठी विचित्र राजकीय खेळी जिल्ह्यातील काही नेतृत्त्वांनी सुरू केली. त्यामुळे १९८० नंतरच्या विधानसभा निवडणुकीपासून सांगलीचा दबदबा कमी होत गेला. त्यामुळे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा अपवाद वगळता राज्याच्या राजकारणात एक व दोन नंबरचे स्थान मिळविण्याची संधी जिल्ह्यातील नेतृत्वाला मिळाली नाही. उलट एकाच मतदारसंघातून दोन्ही विरोधक एक खासदार व दुसरा आमदार होण्यापर्यंतच्या राजकीय तडजोडीविषयी उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.

‘तासगावात आबा अन् सांगलीत काका’

१९७८ ते २०२४ या ४६ वर्षांच्या राजकारणात दिनकरराव पाटील व आर. आर. पाटील या दोन्ही घराण्यांच्या हातात तासगाव विधानसभा मतदारसंघाची सत्ता आहे. दिनकरराव पाटील यांच्यानंतर पुतणे खा. संजय पाटील यांनी राजकीय सूत्रे हाती घेतली. तर आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर पत्नी व आ. सुमन पाटील आणि मुलगा रोहित पाटील यांच्या हाती राजकीय सूत्रे आहेत. दरम्यानच्या काळात २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात तासगावमध्ये नवीन राजकीय पॅटर्न उदयास आला. तासगावात विधानसभेसाठी आर. आर. आबा यांचे वारसदार अन् सांगलीत खासदारकीसाठी काका ही नवीन राजकीय तडजोड १० वर्षांपासून सुरू झाली आहे.

वसंतदादा घराण्याला विरोध का?

दक्षिण साताऱ्यातून सांगलीच्या स्वतंत्र अस्तित्त्वापासून जिल्ह्याचे नेतृत्व वसंतदादा पाटील की, राजारामबापू पाटील यांनी करायचे हा जुना म्हणजे ५० वर्षांपासूनचा वाद आहे. १९८० ला वसंतदादा पाटील ते २०१४ पर्यंत प्रतीक पाटील अशी तीन पिढ्या सलग ३५ वर्षे दादा घराण्याकडे सांगलीचे नेतृत्व आहे. परंतु जिल्ह्यातील काही मोठ्या नेत्यांच्या छुप्या पाठिंब्यावर व मोदी लाटेत संजय पाटील हे भाजपचे पहिले सांगलीचे खासदार झाले. आता पुन्हा विशाल पाटील यांची लोकसभेच्या माध्यमातून सांगलीची नेतृत्व करण्याची इच्छा आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना स्वाभिमानीची उमेदवारी घेऊनही अपयश आले. परंतु वसंतदादा यांच्या घराण्यातील वारसदार म्हणून विशाल पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी जिल्ह्यातील तडजोडीच्या राजकारणामुळे अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेस