शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मळीमिश्रित पाण्याने कृष्णाकाठची जनता त्रस्त, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 13:35 IST

गेल्या दोन महिन्यांपासून नदीकाठच्या गावात डेंग्यू, चिकुननिया, गॅस्ट्रो, ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, आदी साथीच्या आजारांचा फैलाव

शरद जाधवभिलवडी : वारंवार येणारा महापूर व कोरोनाच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या पलूस तालुक्यातील जनतेला इतिहासातील काळ्या पाण्यापेक्षाही गंभीर अशा हिरव्यागार मळीमिश्रित पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नदीकाठच्या गावात साथीच्या रोगांचा फैलाव वाढला आहे. प्रशासनातील अधिकारी आणि नेतेमंडळींना याो काहीच सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसत आहे.डेंग्यू, चिकुननिया, गॅस्ट्रो, ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, आदी साथीच्या आजारांचा फैलाव झाला आहे. भिलवडी, माळवाडी, अंकलखोप, औदुंबर, नागठाणे, रामानंदनगर, बुर्ली, आमणापूर, नागराळे, धनगाव, सुखवाडी, खटाव, ब्राह्मनाळ, वसगडे, दह्यारी, घोगाव, पुणदी, आदी गावांना कृष्णा नदीमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी दूषित असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मळीमिश्रित पाणी आणि सतत बदलत्या हवामानामुळे  रुग्ण वाढत आहेत.कृष्णा नदीतील पाणीपातळी खालावली आहे. त्यातच वरचेवर मळीमिश्रित पाणी सोडल्याने नदीपात्र हिरवेगार बनले आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे दुर्लक्ष आहे. जिल्हा प्रशासनाने आणि मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी