शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

गुड न्यूज: चांदोली व्याघ्र प्रकल्पात चितळांची संख्या वाढली, आता प्रतीक्षा वाघांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:56 IST

झोळंबी स्थानांतरण केंद्रात ६० चितळ : प्रजननवाढीसाठी प्रयत्न

शिराळा : देशातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या वाघांचे चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्यात येणार आहे. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा हालचाली सुरू आहेत. चांदोली अभयारण्यातील झोळंबी येथील स्थानांतरण केंद्रात चितळ आणून प्रजनन करून संख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू असून यास यश येऊन सध्या येथे ५५-६० चितळ आहेत. मात्र अद्याप वाघांना आणण्यास परवानगी मिळालेली नाही.सध्या काही प्रकल्प क्षेत्रात वाघांची संख्या अत्यल्प असून, काही ठिकाणी अधिक आहे. जास्त संख्या असणाऱ्या क्षेत्रातील वाघ कमी संख्या असणाऱ्या प्रकल्प क्षेत्रात आणून सोडण्यासह वाघांच्या संवर्धनासाठी आवश्यक बाबींवर तीन वर्षांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रानंतरच्या बैठकीत विचारविनिमय झाला होता. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. राज्यातील ताडोबा प्रकल्प क्षेत्रात, चंद्रपूर, गडचिरोलीत वाघांची संख्या मोठी आहे. मानवी वस्ती वरील अतिक्रमणामुळे जंगल व मानवी वस्ती यांच्या सीमारेषा अस्पष्ट झाल्या आहेत. 

देशातील अशा जादा संख्येने वाघ असणाऱ्या क्षेत्रातील काही वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यासाठी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून प्रकल्प क्षेत्राचा गेल्या तीन वर्षांपासून अभ्यास सुरू आहे. त्याचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. अहवाल सादर झाल्यानंतर सह्याद्री प्रकल्पात वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील मिळणार आहे. राज्य वन्यजीव संवर्धन आराखड्यानुसार वाघांचा अधिवास वाढवण्याचा प्रस्ताव आहे. 

झोळंबी येथिल स्थानांतरण केंद्र येथे एप्रिल २०२२ मध्ये २४ चितळ सोडली होती. त्यांना ८ पिले झाली आहेत. १ एप्रिल २०२३ ला सागरेश्वर येथून दोन नर आणि दोन मादी चितळ आणली होती. चितळ हे वाघाचे मुख्य खाद्य आहे. चांदोली जंगलात वाघ आणायचा तर त्याला चितळांची संख्या पुरेशी असणे गरजेचे आहे. म्हणून शासनाने सागरेश्वर, कात्रज आणि सोलापूर येथून चितळ आणून चांदोली जंगलात सोडण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी आठ हेक्टर क्षेत्राला कुंपण करून त्यात यांना सोडून त्याचे प्रजनन करून संख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे, याला यश ही येत आहे.

चितळांची पैदास समाधानकारकझोळंबी येथील केंद्रात सध्या ५५-६० चितळ आहेत. त्यांना योग्य पोषक आहार देण्यात येत आहे. पावसाळ्यात सरकी पेंड आदी तर उन्हाळ्यात मका, बाजरी, हत्ती गवत आदी खाद्य दिले जाते. त्यांची पैदास ही समाधानकारक आहे. - किरण माने, वनक्षेत्रपाल, चांदोली

टॅग्स :SangliसांगलीforestजंगलTigerवाघ