शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सांगलीतील उमेदवारीचा चेंडू काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात, जिल्ह्यातील नेत्यांना समझोता घडविण्यात अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 18:00 IST

जयश्रीताई पाटील निवडणूक लढण्यावर ठाम

सांगली : सांगलीविधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत. या दोघांमध्ये समझोता घडविण्याची जबाबदारी आमदार डॉ. विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील यांच्यावर होती. पण गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही. त्यामुळे सांगलीतील पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टाकला आहे.सांगली विधानसभेची निवडणूक लढविण्यावरून काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत खासदार विशाल पाटील यांच्या सांगलीतील बंगल्यावर बैठक झाली; पण बैठकीमधून कोणताही तोडगा निघाला नाही. पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील समर्थक निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.कदम व पाटील यांनी चार तास चर्चा करूनही निर्णय झाला नाही. पक्षश्रेष्ठींकडे शुक्रवारी नावे पाठवायची होती; पण इच्छुकांमध्ये तोडगा न निघाल्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात सांगली मतदारसंघाचा चेंडू टाकला आहे. दोन दिवसांत मुंबई काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.

मी निवडणूक लढणारच : जयश्रीताई पाटीलमी पक्षाकडे सांगली विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी मागितली आहे. पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये माझे कार्यकर्ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, अशी प्रतिक्रिया इच्छुक उमेदवार जयश्रीताई पाटील यांनी दिली.

विधान परिषदेसह सर्व प्रस्ताव फेटाळले..जयश्रीताई पाटील यांच्यासाठी विधान परिषदेचा प्रस्ताव बैठकीत दिला होता. तसेच महापालिका क्षेत्रातील राजकीय नेतृत्वाची जबाबदारी व जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपदाची ऑफर दिली होती; पण हे सर्व प्रस्ताव जयश्रीताई आणि त्यांच्या समर्थकांनी नाकारले आहेत. त्या विधानसभा लढण्यावर ठाम असून, या अगोदर त्यांनी बंडखोरीचाही इशारा दिला आहे.

एकाने लढावे, एकाने विधानपरिषद घ्यावी : विश्वजीत कदमसांगली विधानसभा निवडणुकीत एकाने लढावे आणि एकाला आगामी विधानपरिषद निवडणुकीत संधी दिली जावी, असा तोडगा डॉ. विश्वजीत कदम यांनी काढला. त्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व खासदार राहुल गांधी यांनी देखील सांगलीसाठी एक विधानपरिषद देण्याचे मान्य केले आहे, असे डॉ. कदम यांनी स्पष्ट केले. त्यानंतरही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे नुकसान होईल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदम