शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

वसंतदादांचे नातू म्हणतात...शरद पवारांच्या बंडाचा विषय तेव्हाच संपला

By अविनाश कोळी | Updated: July 3, 2023 19:22 IST

वसंतदादा मुख्यमंत्री असताना १९७८ मध्ये शरद पवारांनी बंडखोरी करून सरकार पाडले होते

सांगली : दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याविरोधात शरद पवारांनी केलेल्या बंडाचा विषय दादांनी त्याचवेळी मनातून काढून टाकला होता. आम्ही आजपर्यंत कधीही बदल्याच्या भावनेने राजकारण केले नाही, असे दादांचे नातू व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.वसंतदादा मुख्यमंत्री असताना १९७८ मध्ये शरद पवारांनी बंडखोरी करून सरकार पाडले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात भाजप व राष्ट्रवादीत सध्या वाकयुद्ध सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीतील ९ आमदार फुटल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.वसंतदादांचे नातू म्हणून तुम्ही राष्ट्रवादीच्या फुटीकडे कसे पाहता, असा प्रश्न विशाल पाटील यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, वसंतदादांचे सरकार पाडले तेव्हा त्याच्या वेदना त्यावेळी त्यांच्यासह पक्षातील सर्वच नेते, कार्यकर्त्यांना झाल्या होत्या. पण, वसंतदादांनी कधीही बदल्याच्या भावनेने राजकारण केले नाही. त्यांनीच तो विषय सोडून दिला. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही कधीही तशी भावना जपली नाही. काँग्रेसमध्येही तशी परंपरा नाही. त्यामुळे या घटनेकडे आम्ही कधीच बदल्याच्या भावनेने पाहणार नाही.काँग्रेस पक्षाच्या विचाराने व आदेशाने यापुढे आम्ही वाटचाल करू. महाविकास आघाडी म्हणून शरद पवार यांच्या पाठीशी राहायचा निर्णय पक्षाने घेतला तर आम्ही त्याचे पालन करू, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीVasantdada Patilवसंतदादा पाटीलSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष