शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

वसंतदादांचे नातू म्हणतात...शरद पवारांच्या बंडाचा विषय तेव्हाच संपला

By अविनाश कोळी | Updated: July 3, 2023 19:22 IST

वसंतदादा मुख्यमंत्री असताना १९७८ मध्ये शरद पवारांनी बंडखोरी करून सरकार पाडले होते

सांगली : दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याविरोधात शरद पवारांनी केलेल्या बंडाचा विषय दादांनी त्याचवेळी मनातून काढून टाकला होता. आम्ही आजपर्यंत कधीही बदल्याच्या भावनेने राजकारण केले नाही, असे दादांचे नातू व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.वसंतदादा मुख्यमंत्री असताना १९७८ मध्ये शरद पवारांनी बंडखोरी करून सरकार पाडले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात भाजप व राष्ट्रवादीत सध्या वाकयुद्ध सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीतील ९ आमदार फुटल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.वसंतदादांचे नातू म्हणून तुम्ही राष्ट्रवादीच्या फुटीकडे कसे पाहता, असा प्रश्न विशाल पाटील यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, वसंतदादांचे सरकार पाडले तेव्हा त्याच्या वेदना त्यावेळी त्यांच्यासह पक्षातील सर्वच नेते, कार्यकर्त्यांना झाल्या होत्या. पण, वसंतदादांनी कधीही बदल्याच्या भावनेने राजकारण केले नाही. त्यांनीच तो विषय सोडून दिला. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही कधीही तशी भावना जपली नाही. काँग्रेसमध्येही तशी परंपरा नाही. त्यामुळे या घटनेकडे आम्ही कधीच बदल्याच्या भावनेने पाहणार नाही.काँग्रेस पक्षाच्या विचाराने व आदेशाने यापुढे आम्ही वाटचाल करू. महाविकास आघाडी म्हणून शरद पवार यांच्या पाठीशी राहायचा निर्णय पक्षाने घेतला तर आम्ही त्याचे पालन करू, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीVasantdada Patilवसंतदादा पाटीलSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष