शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

..अखेर पाथरपुंज, कोळणे गावच्या पुनर्वसन प्रश्नाबाबत हालचालीस वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 16:39 IST

विकास शहा शिराळा : देशात सर्वाधिक पावसाची नोंद झालेले सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज आणि कोळणे या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी ...

विकास शहाशिराळा : देशात सर्वाधिक पावसाची नोंद झालेले सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज आणि कोळणे या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्यासाठी वन विभागाच्या हालचालीस वेग आला आहे. पाथरपुंजच्या ९१ व कोळणेच्या २४ कुटुंबांनी वनक्षेत्रामधील जमिनी राहण्यासाठी (वसाहत) व शेतीसाठी पसंत केलेल्या आहेत तसेच पंधरा कुटुंबांचा जमीन न घेता स्वतःहून पुनर्वसन प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. याबाबत सर्व प्रस्ताव वन विभागामार्फत तयार करण्यात येत आहेत.कोयनानगरच्या नैर्ऋत्येला असलेले पाथरपुंजसह मळे आणि कोळणे या तिन्ही गावांमध्ये मिळून ३५० कुटुंबांचे वास्तव्य आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (कोअर झोन) म्हणून घोषित झाले असल्याचे या तीन गावांचे स्थलांतर करून पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे शासनाने त्यावेळी जाहीर केले होते.ही गावे स्थलांतर करण्याची आहे म्हणून या गावातील जनतेला वाहतूक व्यवस्था, शाळा शैक्षणिक सुविधा आदी नागरी सुविधांपासून आजपर्यंत वंचित आहेत. येथील नागरिक अनेक वर्षांपासून कसत असलेली शेती २००४ पासून कसू नये, असे शासनाने वन विभागास कळविले आहे. त्यामुळे तीन गावांचा उदरनिर्वाह बंद झाल्याने जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. पुनर्वसन व्हावे यासाठी येथील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कारही टाकण्याचा पवित्रा घेतला होता.जमीन न घेता स्वतःहून पुनर्वसनासाठी तयार असणाऱ्या कुटुंबीयांना पंधरा लाख रुपये व त्यांचे मालमत्ता मूल्यांकन करून निधी देणे, अंतरंग यावर्षी पुन्हा पंधरा कुटुंबांचा जमीन न घेता स्वतःहून पुनर्वसन प्रस्ताव वन्यजीव विभागाकडून जात आहे. तसेच सांगली वन विभागामार्फत पाथरपुंज, मौजे कोळणे येथील प्रकल्पग्रस्तांकरिता ढाणेवाडी, येडे, उपाळेवांगी व तोंडोली येथील २१०.०२ हे. वनजमीन निर्वणीकरणाचा प्रस्ताव शासनास सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

चांदोली अभयारण्यातील मौजे पाथरपुंज व मौजे कोळणे येथील प्रकल्पग्रस्तांना सांगली वन विभागांतर्गत मौजे ढाणेवाडी, येडे, उपाळेवांगी व तोंडोली येथील वनक्षेत्रामधील जमिनी दाखविण्यात आल्या असून प्रकल्पग्रस्तांना वरील वनक्षेत्रामधील जमिनी राहण्यासाठी व शेतीसाठी पसंत केलेल्या आहेत. त्याअनुषंगाने २१०.०२ हे. वनजमीन निर्वणीकरणाचा वन (संरक्षण एवं संवर्धन) अधिनियम १९८० अंतर्गत प्रस्ताव शासनास सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. - डॉ. अजित साजने, सहायक वनसंरक्षक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसर