शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

ऊसतोडणीसाठी शेतकऱ्याला सोसावा लागतोय हजारोंचा भुर्दंड, ऊसतोड टोळ्यांकडून लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 19:14 IST

साखर कारखाना नियंत्रण ठेवण्याची गरज

महेश देसाईकवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, तालुक्यात विविध कारखान्यांची ऊसतोडणी सुरू आहे. पण, उसाची मोठ्या प्रमाणात असलेली उपलब्धता, त्यात मजुरांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना उसाची तोडणी करण्यासाठी ऊसतोड टोळीच्या पाठीमागे लागावे लागत आहे व ऊसतोड करणाऱ्यांकडून आर्थिक व जेवणाची मागणी होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

दरवर्षी एकरी हजारोपर्यंत रक्कम घेऊन ऊस तोडला जायचा. मात्र, त्यातही यंदा आणखीन मजुरांची संख्या कमी असल्याने हा रेट वाढतच चालला आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांवर ऊसतोड मजुरांना पार्ट्या आणि हजारो रुपये देऊन ऊसतोड करण्याची वेळ आलेली आहे. अनेक मोठ्या ठिकाणी रकमा घेऊनही टोळ्या फरार झाल्याचे चित्र आहे. मजुरांअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे.ऊसतोडणी लांबत चालल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कारखानदारांनी लक्ष देऊन कार्यक्षेत्रात नोंद असलेला ऊस योग्य वेळेत तोडून नेण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. कारखानदारांनी या ऊसतोड करणाऱ्या मुकादम, ठेकेदार, ऊसतोड यांच्यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी आता करू लागले आहेत.अपुऱ्या रस्त्यामुळे ऊस वाहतुकीस अडचण 

कवठेमहांकाळ तालुक्यात अपुऱ्या रस्त्यामुळे ऊस वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. रेल्वेचे छोटे भुयारी पूलही उसाच्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रकसाठी अडचणीचे ठरत आहेत. तर, वाहनधारकांना प्रवास करतानाही अडचण येत आहे. तर, राष्ट्रीय महामार्गावर ऊस ट्रॅक्टर टॉल्या उभ्या असतात. याकडे पोलीस प्रशासनाने कारवाई केली.

ऊसतोड करण्यासाठी विविध कारखान्यांच्या टोळ्या गावात आल्या असून, शेतकऱ्यांकडून हजारो रुपये घेतल्यानंतरच ऊस तोडणाऱ्या टोळ्या प्रसन्न होत असल्याने सगळीकडे हाच ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे कारखानदारांनी ही बाब गांभीर्याने घेत त्यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी अन्यथा कारखानदारांच्या विरोधात उपोषणास बसणार आहे. -अंकुश कांबळे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी कोकळे.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने