शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणीसाठी शेतकऱ्याला सोसावा लागतोय हजारोंचा भुर्दंड, ऊसतोड टोळ्यांकडून लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 19:14 IST

साखर कारखाना नियंत्रण ठेवण्याची गरज

महेश देसाईकवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, तालुक्यात विविध कारखान्यांची ऊसतोडणी सुरू आहे. पण, उसाची मोठ्या प्रमाणात असलेली उपलब्धता, त्यात मजुरांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना उसाची तोडणी करण्यासाठी ऊसतोड टोळीच्या पाठीमागे लागावे लागत आहे व ऊसतोड करणाऱ्यांकडून आर्थिक व जेवणाची मागणी होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

दरवर्षी एकरी हजारोपर्यंत रक्कम घेऊन ऊस तोडला जायचा. मात्र, त्यातही यंदा आणखीन मजुरांची संख्या कमी असल्याने हा रेट वाढतच चालला आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांवर ऊसतोड मजुरांना पार्ट्या आणि हजारो रुपये देऊन ऊसतोड करण्याची वेळ आलेली आहे. अनेक मोठ्या ठिकाणी रकमा घेऊनही टोळ्या फरार झाल्याचे चित्र आहे. मजुरांअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे.ऊसतोडणी लांबत चालल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कारखानदारांनी लक्ष देऊन कार्यक्षेत्रात नोंद असलेला ऊस योग्य वेळेत तोडून नेण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. कारखानदारांनी या ऊसतोड करणाऱ्या मुकादम, ठेकेदार, ऊसतोड यांच्यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी आता करू लागले आहेत.अपुऱ्या रस्त्यामुळे ऊस वाहतुकीस अडचण 

कवठेमहांकाळ तालुक्यात अपुऱ्या रस्त्यामुळे ऊस वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. रेल्वेचे छोटे भुयारी पूलही उसाच्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रकसाठी अडचणीचे ठरत आहेत. तर, वाहनधारकांना प्रवास करतानाही अडचण येत आहे. तर, राष्ट्रीय महामार्गावर ऊस ट्रॅक्टर टॉल्या उभ्या असतात. याकडे पोलीस प्रशासनाने कारवाई केली.

ऊसतोड करण्यासाठी विविध कारखान्यांच्या टोळ्या गावात आल्या असून, शेतकऱ्यांकडून हजारो रुपये घेतल्यानंतरच ऊस तोडणाऱ्या टोळ्या प्रसन्न होत असल्याने सगळीकडे हाच ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे कारखानदारांनी ही बाब गांभीर्याने घेत त्यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी अन्यथा कारखानदारांच्या विरोधात उपोषणास बसणार आहे. -अंकुश कांबळे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी कोकळे.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने