शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Sangli: सव्वातीनशे कोटी खर्चाचे आव्हान, दोन महिन्यात निधी खर्च करावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 19:21 IST

शासनाकडून ६० टक्के निधी मिळणार कधी?

सांगली : राज्य शासनाकडून जिल्हा नियोजनला ४८६ कोटींचा आराखडा मंजूर असून त्यापैकी १६१ कोटी रुपये खर्च झाले असून ३२५ कोटी रुपये शिल्लक आहेत. शासनाकडून ४० टक्केच निधी मिळाला असून उर्वरित निधी खर्चानुसार मिळणार आहे. पण, शासनाकडून मिळालेला निधी ३१ मार्चपर्यंत १०० टक्के खर्चाचे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान आहे. दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक असून यामध्ये निधी खर्चाचे नियोजन होणार आहे.जिल्हा वार्षिक योजनेमधून २०२४-२५ या वर्षात ४८६ कोटी रुपये मंजूर आहेत. यापैकी २११ कोटी रुपये शासनाकडून मिळाले आहेत. या निधीतून जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अन्य शासकीय कार्यालयांनी आतापर्यंत १६१ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. हा निधी मागणीनुसार जिल्हा नियोजन विभागाने संबंधित विभागाला वितरित केला आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या ४० टक्के निधीपैकी ५० कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे. उर्वरित ६० टक्के निधी म्हणजे २७५ कोटी रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत. हा निधी येत्या दोन महिन्यांत खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवार दि. २ फेब्रुवारीला सांगलीत आयोजित केली आहे. या बैठकीत शिल्लक निधी आणि शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांना मंजुरी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांना जिल्हा नियोजनचा निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी आहे. पण, त्यापूर्वीचा निधी ३१ मार्च २०२५ अखेर खर्च करणे त्यांना सक्तीचे आहे.

शासनाकडून ६० टक्के निधी मिळणार कधी?राज्य शासनाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्ह्याला जिल्हा नियोजनमधून ४८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. यापैकी आतापर्यंत केवळ २११ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. उर्वरित २७५ कोटी रुपयांचा निधी कधी मिळणार? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. शासनाकडून शिल्लक निधी मिळणार की नाही, अशीही अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. या निधीला १० ते २० टक्के कात्री लागण्याची शक्यता असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPlanning Commissionनियोजन आयोगfundsनिधी