शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पंधरा हजारांच्या बेभरवशी नोकरीसाठी तरुणांचा उद्रेक, सांगली जिल्हा परिषदेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:58 IST

अर्जस्वीकृती अचानक थांबविल्याने हवालदिल

सांगली : पदवीनंतरही अपेक्षित नोकरी मिळत नसल्याचा उद्रेक सोमवारी जिल्हा परिषदेत पाहायला मिळाला. १५ हजार रुपये मानधनाची कंत्राटी नोकरभरती अचानक थांबविल्याने उमेदवार आक्रमक झाले. त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला; पण गायकवाड यांनी त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडत समुपदेशन केले.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत १३६ कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी तब्बल तीन हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी १० डिसेंबरपर्यंतची मुदत होती; पण पाच दिवस अगोदरच प्रशासनाने अर्जांची स्वीकृती अचानक थांबविली. तसे आदेश शासनाकडून आले होते. याची माहिती मिळताच दुपारपासूनच मोठ्या संख्येने बेरोजगार तरुण जिल्हा परिषदेत गोळा झाले. शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्या कक्षाबाहेर गर्दी केली. सायंकाळी गायकवाड यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी हवालदिल झालेल्या तरुणांनी गायकवाड यांच्याकडे भरती प्रक्रिया अचानक का थांबविली, याची विचारणा केली. दोन टप्प्यांत भरलेले अर्ज वेगवेगळे ठेवल्याने संभ्रम निर्माण झाला आहे, असेही सांगितले. एकाच वेळी पन्नासभर युवक-युवतींनी गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण होते. गायकवाड यांनी त्यांचे पूर्ण समाधान केले. ते म्हणाले, भरतीसंदर्भात शासन नव्याने निर्णय घेणार आहे. दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळांत कंत्राटी स्वरूपात शिक्षकनियुक्ती केली जाणार आहे. अशा शाळांच्या गावातील स्थानिक पात्र उमेदवारांनाच सर्वोच्च गुणवत्तेनुसार नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. १३६ जागांसाठी ३००० अर्ज आल्याने गुणवत्ताच प्रमुख निकष असणार आहे. त्या जागेवर कायम शिक्षक नियुक्त होताच कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती आपोआप संपुष्टात येणार आहे. शासनाने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया थांबवली असली, तरी आम्ही जिल्हा परिषद स्तरावर ते स्वीकारत आहोत. त्याबाबतचा पुढील निर्णय वरिष्ठ घेतील. त्यामुळे तरुणांनी कोणताही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. संयम बाळगावा. कोणावरही अन्याय किंवा कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. गायकवाड यांच्या खुलाशानंतर तरुण पांगले.

बेरोजगारांची रेटारेटी१५ हजार रुपये मानधनाची ही नोकरी कंत्राटी आहे. या जागेवर नियमित शिक्षक कधीही येऊ शकतो. तो येताच कंत्राटी तरुणांना नोकरी सोडावी लागणार आहे. तरीही अवघ्या काही महिन्यांच्या बेभरवशी नोकरीसाठी तरुणांची रेटारेटी सुरू आहे. फक्त १३६ जागा असतानाही हजारो तरुण त्यासाठी धावले आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदjobनोकरी