शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जयंत पाटील यांच्याभोवतीच्या चार बापूंच्या अभेद्य भिंतीचा अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 16:01 IST

दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधीची प्रतीक्षा

अशोक पाटीलइस्लामपूर : गेली ३५ वर्षे इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. सलग सात विधानसभा निवडणुकीतील मताधिक्याचा आलेख वाढतच गेला. आठव्या विधानसभा निवडणुकीत मतांचा टक्का एकदमच घसरला. याची कारणमीमांसा सुरू असून, त्यामध्ये पाटील यांच्याभोवती चार बापूंची असलेली अभेद्य भिंत हे प्रमुख कारण व अडथळा कार्यकर्त्यांना वाटत आहे. या बापूंच्या भिंतीमुळेच दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नव्या कार्यकर्त्यांना साहेबांपर्यंत पोहचता येत नसल्याचे आता समर्थक उघडपणे बोलू लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीत पाटील यांचे मताधिक्य घटण्याचे एकमेव कारण म्हणजे लाडकी बहीण, ऊस दर व विकास कामांची कामे वर्षानुवर्षे एकाच घरातील कार्यकर्त्यांना मिळणे. त्यामुळे गेली ३५ वर्षे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणे दुरापास्त झाले. त्यामुळे मतदारसंघातील ग्राउंड रियालिटी व वास्तव साहेबांपर्यंत पोहचू शकत नाही. 

उरूण परिसरातील बाळासाहेब पाटील (बापू) यांची राजकीय कारकीर्द राजारामबापू पाटील यांच्यापासून सुरू झाली. स्थानिक पातळीवर त्यांचे राजकारण नसले तरी जयंत पाटील यांच्या राजकीय घडामोडींत सहभाग असतो. त्यांना थेट पाटील यांच्या दरबारात प्रवेश मिळतो. याची चर्चा मात्र कार्यकर्त्यांतून नेहमीच असते. नेर्ले गावचे सरपंच संजय पाटील (बापू) सुध्दा पाटील यांच्या जवळचे मानले जातात. ग्रामीण भागातील निर्णय घेताना संजय पाटील यांचाच शब्द प्रमाण मानला जातो.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील (बापू) सध्या जयंत पाटील यांचे खास असल्याचे मानले जातात. प्रतीक पाटील यांनी कारखान्याची सूत्रे हाती घेतली, तरी विजय पाटील यांच्या सल्ल्यानेच आणि जयंत पाटील यांच्या आदेशानेच साखर कारखान्यातील कारभार चालतो. त्यानंतर इस्लामपूर शहरातील सर्व कारभार शहाजी पाटील (बापू) यांच्या हाती असला तरी जयंत पाटील हे ॲड. चिमण डांगे (भाऊ) व खंडेराव जाधव (नाना) यांचाही सल्ला घेतात. एकंदरीत, पाटील यांच्या कारभारात चार बापूंना महत्त्व आल्याची चर्चा मात्र मतदारसंघात रंगतदार सुरू आहे.

आमच्या घराण्यातील तीनही पिढ्या राजारामबापू पाटील ते जयंत पाटील आणि त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्याबरोबर आहोत. एकनिष्ठतेमुळे पाटील यांचा आमच्यावर विश्वास आहे; परंतु आम्ही कोणालाही अडथळा व अडचण ठरणारे नाहीत. त्यामुळे कधी-कधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर रागावण्याचा हक्क आमचे नेते जयंत पाटील यांना आहे. - शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण