शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

Sangli: आधी मुलगा, आता पत्नी गेली; खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताने आंब्रे कुटुंबच उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:03 IST

आंब्रे कुटुंबीयांवर वर्षभरात दोन आघात : कुटुंबच उद्ध्वस्त,

सांगली : पत्र्याचे दोन खोल्याचे घर, पदरात दोन मुलं, काबाडकष्ट करून दोघांनाही वाढवलेलं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताने अधू होऊन घरातील तरुण मुलाने आत्महत्या केली तर सोमवारी आणखी एका खड्ड्याने त्याच मुलाच्या आईचा अपघातीमृत्यू झाला. दोन खड्ड्यांनी या कुटुंबातील दोन सदस्यांना हिरावून घेत आयुष्यात न भरुन येणारा खड्डा निर्माण केला.कोकणातील आंब्रे कुटुंबीय ४० वर्षांपूर्वी सांगलीत आले. मोलमजुरी करून संसाराचा गाडा सुरू होता. पण, गेल्या वर्षभरात या कुटुंबावर दोन मोठे आघात झाले. वर्षभरापूर्वी मुलगा गेला आणि काल एसटीने चिरडून पत्नी. भिंतीवर अजूनही मुलाचा फोटा लावलेला आहे. आता त्याच्या शेजारी पत्नीचा फोटो लावण्याची वेळ आली. अपघाताने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले.प्रकाश आंब्रे, त्यांची पत्नी शीतल, मुलगा यश आणि मुलगी, असा हा परिवार. ३० ते ४० वर्षांपूर्वी कोकणातील देवरुखमधून हे कुटुंब कामाच्या शोधात सांगलीत आले. आकाशवाणीच्या मागे गंगाधरनगरमध्ये छोट्या जागेत पत्र्याच्या शेडवजा घरात प्रकाश यांचा संसार फुलला होता. प्रकाश सकाळी चारचाकी गाड्यांच्या सर्व्हिसिंगचे काम करुन गॅरेजमध्ये कामाला जात होते. तर पत्नी शीतल या एका साडीच्या दुकानात कामाला होत्या. घराला मदत व्हावी, म्हणून शिवणकाम करीत. तर कधी धुणीभांडी तर कुणाचा स्वयंपाकही करायला त्या जात. घरची परिस्थिती अगदीच बेताची. पत्र्याच्या दोन खोल्यातही सुखी संसाराची स्वप्ने प्रकाश यांनी रंगविली असतील. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

वर्षभरापूर्वी मुलगा यशचा हरिपूर रस्त्यावर अपघात झाला. खड्ड्यामुळे त्याची दुचाकी घसरली अन् त्यात त्याच्या पायाला मोठी जखम झाली. दोन महिने तो अंथरुणावर खिळून होता. प्रकाश व शीतल यांनी त्याच्या उपचारासाठी दिवसरात्र एक केला. प्रसंगी नातेवाइकांनी मदतीचा हात दिला. यशच्या पायावर शस्त्रक्रिया झाली, पण ते दुखणे त्याला सहन झाले नाही. त्यातच त्याने आत्महत्या केली. तरुण पोराच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्या दु:खातून बाहेर पडण्याआधीच पुन्हा या कुटुंबावर काळाने घाला घातला.

कुटुंबाच्या व्यथेने साऱ्यांनाच धक्काशीतल या कोल्हापूरहून बसने सांगलीत आल्या. आकाशवाणीजवळ त्या बसमधून उतरल्या आणि त्याच बसखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कुटुंब कोलमडले आहे. घरात अश्रूंच्या धारा वाहत आहेत. नातेवाइक, शेजाऱ्यांच्या ह्दयातही या घटनेने कालवाकालव झाल्याचे दिसत होते.

..तर बळी गेला नसताआईचे छत्र हरविलेली मुलगी, दु:खाचा डोंगर कोसळलेला बाप आणि कोलमडून पडलेली ७५ वर्षांची आजी, इतके काय ते विश्व उरले आहे. हा रस्ता वेळेत झाला असता, तर आज एक जीव वाचला असता. हा फक्त आंब्रे कुटुंबाचा नाही, तर सगळ्या सांगलीकरांचा प्रश्न आहे.