शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

खानापूर-आटपाडीत नेत्यांची कॉँग्रेसकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:52 PM

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : घर फिरले की त्याबरोबर वासेही फिरतात, असे म्हणतात. ज्या कॉँग्रेस व ...

अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : घर फिरले की त्याबरोबर वासेही फिरतात, असे म्हणतात. ज्या कॉँग्रेस व राष्टÑवादीची विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून भले-भले देव पाण्यात घालत होते, तिथे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मात्र सध्या सर्व प्रस्थापित नेत्यांनी कॉँग्रेस-राष्टÑवादीकडे पाठ फिरवली आहे. कॉँगे्रसकडून पक्षाचे राज्य सरचिटणीस राजाराम देशमुख यांनी, तर राष्टÑवादीकडे रावसाहेब पाटील आणि हणमंतराव देशमुख यांनी तिकीट मागितले आहे.हा विधानसभा मतदारसंघ गेली कित्येक वर्षे कॉँग्रेस आणि राष्टÑवादीकडेच होता. राष्टÑवादीची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी आ. अनिल बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख हे खूप प्रयत्न करीत होते. आता बाबर शिवसेनेत आहेत, तर राजेंद्रअण्णा भाजपात गेले. राष्टÑवादीचे तिकीट मिळविण्यासाठी ही मंडळी निवडणुकीअगोदरच मोर्चे, पाण्याचा प्रश्न आणि शेतकरी मेळावे घेऊन चांगलेच शक्तिप्रदर्शन करायची. आपणच कसे पक्षाशी आणि जनतेशी एकनिष्ठ आहोत, हे दाखवायची. तिकीट मिळाले की विजय पक्का, असेच तेव्हा समीकरण होते. राजकारणाच्या बदलत्या वाऱ्याची दिशा या मंडळींनी वेळीच ओळखली आहे. त्यामुळे बुडत्या जहाजात कशाला बसा, म्हणत त्यांनी पक्षांतर केल्याने, या राजकीय पक्षांची तालुक्यात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सत्ता असताना या पक्षांनीही आटपाडी तालुक्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.माजी आमदार सदाशिवराव पाटील हे कॉँग्रेसचे. पण सध्या त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीआधी ते कॉँग्रेसकडून निवडणूक लढणार का नाही, ते ठरणार आहे. दि. ६ जुलैपर्यंत जे कॉँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पक्षाकडे अर्ज करायचे होते. पण पाटील यांनी अर्ज केलेला नाही. सध्या ते आणि त्यांचे पुत्र आटपाडी तालुक्यातही सक्रिय झाले आहेत. ते आमदार असताना दर शुक्रवारी आटपाडी पंचायत समितीत यायचे. त्यातुलनेत गेल्या ५ वर्षात त्यांच्या तालुक्यात भेटी झाल्या नाहीत. पण सध्या तरी त्यांचे येणे-जाणे वाढले आहे. राष्टÑवादीची स्थापना झाल्यानंतर अनेक वर्षे रावसाहेब पाटील या विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष होते. भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष फर्डे वक्ते आहेत. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याशी त्यांचे सख्य आहे. त्यांनी यापूर्वी अनेकवेळा पक्षाकडे तिकीट मागितले आहे. तसेच हणमंतराव देशमुख सध्या राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष आहेत.दिघंची गटात त्यांचा दबदबा आहे. भाजपची लाट असताना त्यांनी पं. स. सदस्य निवडून आणला आहे. कॉँग्रेसकडून तिकीट मागणारे सध्या राजाराम देशमुख हे एकमेव इच्छुक आहेत. सार्वजनिक विवाह यासह अनेक सामाजिक उपक्रम ते करतात. गलाई व्यावसायिकांचे ते नेते आहेत. कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संंबंध आहेत. निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट व्हायचे असले तरी, ही मंडळी प्रस्थापितांशी कशी टक्कर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.‘वंचित’ दिशा ठरविणार?राज्यात कॉँग्रेस-राष्टÑवादी आणि वंचित आघाडीची युती झाली, तर पुन्हा वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ जागा वाटपात कुणाला सुटणार, उर्वरित बंडखोरी करणार काय, का पाठिंबा देणार यावर, तसेच सदाशिवराव पाटील, गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवरच चित्र स्पष्ट होईल.