शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

दहा गावांना पिवळे, तर ६८९ गावांना हिरवे कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:57 PM

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने मान्सूनपूर्व पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील १० गावांना पिवळे, तर ६८९ गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. तपासणीमध्ये दोन तीव्र जोखीम स्रोतांची संख्या असून मध्यम जोखीमचे २५० पाण्याचे स्रोत सापडल्यामुळे संबंधित गावांतील

ठळक मुद्दे पाणीस्त्रोत स्वच्छता सर्वेक्षण : मध्यम जोखीमचे २५० स्रोत

सांगली : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने मान्सूनपूर्व पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील १० गावांना पिवळे, तर ६८९ गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. तपासणीमध्ये दोन तीव्र जोखीम स्रोतांची संख्या असून मध्यम जोखीमचे २५० पाण्याचे स्रोत सापडल्यामुळे संबंधित गावांतील ग्रामपंचायतींना महिन्याभरात उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेन दिल्या आहेत.

जिल्ह्यातून चार हजार २५६ पाणीस्रोत आहेत. यामध्ये नळयोजनांच्या ६६९, विहिरींच्या २४२ आणि हातपंप व विंधन विहिरींच्या तीन हजार ३४५ पाणी स्रोतांचा समावेश आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा स्रोतांचे वर्षातून दोन वेळा सर्वेक्षण करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर हे सर्वेक्षण करण्यात येते. दि. १ ते ३० एप्रिल २०१९ मध्ये जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, लोणारवाडी, कोकळे, करलहट्टी, बसापाचीवाडी, आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी, चिंचाळे, खानापूर तालुक्यातील तांदळगाव, मिरज तालुक्यातील कदमवाडी आदी १० ग्रामपंचायतींना पिवळे, तर ६८९ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आाले. पाणीपुरवठा स्रोतातील पाणी नमुन्यांची कारणे शोधून संबंधित ग्रामपंचायतींना महिन्याभरात उपाययोजना करण्याच्या सूचना जि. प. प्रशासनाने दिल्या आहेत.

पाण्यासाठी सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना, विहीर, कूपनलिका, हातपंप हे स्रोत आहेत. सर्वच स्रोत पिण्यास योग्य असतीलच असे नाही. बºयाचदा अनेक पाणी स्रोतात काही घटकांची कमतरता आढळून येते, तर काही घटक जास्त प्रमाणात असतात. शरीरावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाणी नमुन्यांचे सर्वेक्षण करुन तपासणी करण्यात येते. प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी करुन हे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही हे कळते. पाण्यात काही घटकांची कमतरता असल्यास किंवा काही घटकांचे प्रमाण वाढल्यास त्याबाबत उपाययोजना करण्यात येतात. पावसाळा तोंडावर आला असून पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

अनेकदा कूपनलिकांचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पाणी नमुन्याची तपासणी करण्याकडे लक्ष दिले जात नाही. नागरिकांनी याबाबत दक्षता घेतली पाहिजे. शरीरात जवळपास ७० टक्के पाणी असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी सांगितले.

 

असे दिले जाते : कार्डपाणी स्रोताच्या स्वच्छता सर्वेक्षणानंतर जोखीम तपासणी केली जाते. सौम्य जोखीमसाठी हिरवे, मध्यमसाठी पिवळे व तीव्र जोखीमसाठी संबंधित ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जाते. शून्य ते २९ गुणांपर्यंत हिरवे कार्ड, ३० ते ६९ गुणांपर्यंत पिवळे व ७० पेक्षा जास्त गुणांवर लाल कार्ड मिळते. जिल्ह्यात एकाही ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळालेले नाही. हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतीचे पाणीस्रोत पिण्यास योग्य असून पिवळे कार्ड मिळालेल्या स्रोतांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे.

यांच्या स्वाक्षरीने होते कार्डचे वाटपसौम्य जोखीमचे हिरवे कार्ड वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहीने देण्यात येते, तर पिवळे कार्ड गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तालुका उपअभियंता व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिले जाते. लाल कार्ड हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणSangliसांगली