शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
7
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
8
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
9
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
10
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
11
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
12
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
13
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
14
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
16
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
17
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
18
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
19
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
20
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात पूरस्थितीसाठी यंत्रणा अलर्ट मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:55 IST

प्रशासकीय यंत्रणेला पूरस्थितीतील कार्यवाहीची पूर्वतयारी ठेवण्याच्या सूचना

सांगली : जिल्ह्यात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि कोयना, वारणा धरणातील पाण्याचा साठाही वाढला आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून, कृष्णा आणि वारणा या नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संभाव्य पूरस्थितीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने तातडीने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.जिल्हाधिकारी काकडे यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीत सर्व संबंधित विभागांना सतर्क राहून वेळोवेळी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनीचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, एनडीआरएफचे टीम कमांडर सुशांत शेट्टी, दूरदृश्य प्रणालीद्वारे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, सर्व विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिकेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून पूरबाधित भागांमध्ये नियमित संपर्क ठेवा आणि करावयाच्या उपाययोजनेची पूर्वतयारी कायम ठेवावी. गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, बालकांना प्राधान्याने मदत करणे अनिवार्य आहे. अफवा पसरविण्यापासून बचाव करण्यासाठीही कठोर खबरदारी घेण्याच्या पोलिसांना सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रशासनाकडून मूलभूत सुविधांसाठी सज्जजिल्हाधिकारी काकडे म्हणाले, कृष्णा, वारणा या नद्यांचा इशारा व धोका पातळीची नियमित तपासणी, नागरिकांच्या स्थलांतरणाचे नियोजन, भोजन, निवास व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वेळेत करणे यावर भर दिला. पशुधन आणि शेतजमिनींचे संरक्षण, पुरानंतर आरोग्य व साथीच्या रोगांबाबत औषधांची योग्य उपलब्धता ही प्राथमिकता म्हणून ठेवावी, असेही आवाहन केले.

रुग्णालये, निवारा केंद्रांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवामहसूल, पोलिस, आरोग्य, जलसंपदा व इतर विभागांनी एकत्र काम करून विजेचा पुरवठा निश्चित करावा, तर महावितरणने पूरबाधित भागांमध्ये तात्पुरता वीज पुरवठा खंडित ठेवावा. रुग्णालये व निवारा केंद्रांमध्ये वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी काकडे यांनी दिली आहे.

प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळाअशोक काकडे यांनी वाहतूक विभागाला पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्याचे, अन्न व औषध प्रशासनाला निवारा केंद्रांमध्ये स्वच्छ पेयजल व निर्दोष अन्न पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आवश्यकतेनुसार मॉक ड्रील्स घेण्याची देखील सूचना देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन नागरिकांनाही विनंती करत आहे की पावसाच्या या काळात सतर्क राहावे आणि रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात.