शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सांगली जिल्ह्यात पूरस्थितीसाठी यंत्रणा अलर्ट मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:55 IST

प्रशासकीय यंत्रणेला पूरस्थितीतील कार्यवाहीची पूर्वतयारी ठेवण्याच्या सूचना

सांगली : जिल्ह्यात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि कोयना, वारणा धरणातील पाण्याचा साठाही वाढला आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून, कृष्णा आणि वारणा या नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संभाव्य पूरस्थितीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने तातडीने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.जिल्हाधिकारी काकडे यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीत सर्व संबंधित विभागांना सतर्क राहून वेळोवेळी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनीचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, एनडीआरएफचे टीम कमांडर सुशांत शेट्टी, दूरदृश्य प्रणालीद्वारे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, सर्व विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिकेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून पूरबाधित भागांमध्ये नियमित संपर्क ठेवा आणि करावयाच्या उपाययोजनेची पूर्वतयारी कायम ठेवावी. गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, बालकांना प्राधान्याने मदत करणे अनिवार्य आहे. अफवा पसरविण्यापासून बचाव करण्यासाठीही कठोर खबरदारी घेण्याच्या पोलिसांना सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रशासनाकडून मूलभूत सुविधांसाठी सज्जजिल्हाधिकारी काकडे म्हणाले, कृष्णा, वारणा या नद्यांचा इशारा व धोका पातळीची नियमित तपासणी, नागरिकांच्या स्थलांतरणाचे नियोजन, भोजन, निवास व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वेळेत करणे यावर भर दिला. पशुधन आणि शेतजमिनींचे संरक्षण, पुरानंतर आरोग्य व साथीच्या रोगांबाबत औषधांची योग्य उपलब्धता ही प्राथमिकता म्हणून ठेवावी, असेही आवाहन केले.

रुग्णालये, निवारा केंद्रांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवामहसूल, पोलिस, आरोग्य, जलसंपदा व इतर विभागांनी एकत्र काम करून विजेचा पुरवठा निश्चित करावा, तर महावितरणने पूरबाधित भागांमध्ये तात्पुरता वीज पुरवठा खंडित ठेवावा. रुग्णालये व निवारा केंद्रांमध्ये वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी काकडे यांनी दिली आहे.

प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळाअशोक काकडे यांनी वाहतूक विभागाला पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्याचे, अन्न व औषध प्रशासनाला निवारा केंद्रांमध्ये स्वच्छ पेयजल व निर्दोष अन्न पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आवश्यकतेनुसार मॉक ड्रील्स घेण्याची देखील सूचना देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन नागरिकांनाही विनंती करत आहे की पावसाच्या या काळात सतर्क राहावे आणि रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात.