शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांगलीत ‘स्वाभिमानी’ने वसगडे, नांद्रेत ऊस वाहतुकीची वाहने रोखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:24 IST

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे दराची घोषणा करून ऊस दराची कोंडी फोडावी आणि त्यानंतरच गळीत हंगाम सुरू ...

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे दराची घोषणा करून ऊस दराची कोंडी फोडावी आणि त्यानंतरच गळीत हंगाम सुरू करावेत. या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी वसगडे (ता. पलूस) आणि नांद्रे (ता. मिरज) येथे दत्त इंडिया, राजारामबापू कारखान्याची ऊस घेऊन जाणारी वाहने रोखून धरली आहेत.कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे ऊस दर देण्यास सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी नकार दिला आहे. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक रोखण्याचे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी वसगडे, अंकलखोप, नांद्रे येथील ऊस तोडी रोखून वाहने रोखली आहेत. दिवसभरात शेकडो वाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोखून धरली होती. तसेच अनेक ठिकाणच्या ऊस तोडीही बंद पाडण्याचा प्रयत्न केला.संदीप राजोबा म्हणाले, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फोडली आहे. त्यानुसार तीन हजार रुपयांहून अधिक एफआरपी असणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन ५० रुपये आणि तीन हजार रुपयांपेक्षा कमी एफआरपी असणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन १०० रुपये द्यावेत, असा यशस्वी तोडगा काढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी निर्णय मान्य करून गळीत हंगाम सुरू केले आहेत; पण सांगली जिल्ह्यातील कारखाने कोल्हापूर पॅटर्न मान्य करण्यास तयार नाहीत. या कारखान्यांनी ऊस दराची कोंडी फोडल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करू नयेत, अन्यथा ऊस तोडी रोखणार आहे.

जिल्ह्यातील आंदोलनात विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे संजय बेले, पलूस तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे, उपसरपंच उमेश पाटील, जयकुमार कोले, पलूस तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील, कडेगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संदीप चौगुले, संजय बुद्रुक, अमोल पाटील, रावसो खोत, सुशांत चौगुले, संतोष पाटील, संजय चौगुले, सतीश चौगुले आदी सहभागी होते.

कारखानदारांनी ११० कोटी शेतकऱ्यांचे लाटले : संदीप राजोबाजिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कोल्हापूर पॅटर्नची अंमलबजावणी केली नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ११० कोटी रुपये लाटले आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केला आहे. कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे ११० कोटी रुपये मिळविण्यासाठी आंदोलनाचा लढा आमचा चालूच असणार आहे, असेही राजोबा म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना