शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘स्वाभिमानी’ने वसगडे, नांद्रेत ऊस वाहतुकीची वाहने रोखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:24 IST

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे दराची घोषणा करून ऊस दराची कोंडी फोडावी आणि त्यानंतरच गळीत हंगाम सुरू ...

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे दराची घोषणा करून ऊस दराची कोंडी फोडावी आणि त्यानंतरच गळीत हंगाम सुरू करावेत. या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी वसगडे (ता. पलूस) आणि नांद्रे (ता. मिरज) येथे दत्त इंडिया, राजारामबापू कारखान्याची ऊस घेऊन जाणारी वाहने रोखून धरली आहेत.कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे ऊस दर देण्यास सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी नकार दिला आहे. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक रोखण्याचे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी वसगडे, अंकलखोप, नांद्रे येथील ऊस तोडी रोखून वाहने रोखली आहेत. दिवसभरात शेकडो वाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोखून धरली होती. तसेच अनेक ठिकाणच्या ऊस तोडीही बंद पाडण्याचा प्रयत्न केला.संदीप राजोबा म्हणाले, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फोडली आहे. त्यानुसार तीन हजार रुपयांहून अधिक एफआरपी असणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन ५० रुपये आणि तीन हजार रुपयांपेक्षा कमी एफआरपी असणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन १०० रुपये द्यावेत, असा यशस्वी तोडगा काढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी निर्णय मान्य करून गळीत हंगाम सुरू केले आहेत; पण सांगली जिल्ह्यातील कारखाने कोल्हापूर पॅटर्न मान्य करण्यास तयार नाहीत. या कारखान्यांनी ऊस दराची कोंडी फोडल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करू नयेत, अन्यथा ऊस तोडी रोखणार आहे.

जिल्ह्यातील आंदोलनात विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे संजय बेले, पलूस तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे, उपसरपंच उमेश पाटील, जयकुमार कोले, पलूस तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील, कडेगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संदीप चौगुले, संजय बुद्रुक, अमोल पाटील, रावसो खोत, सुशांत चौगुले, संतोष पाटील, संजय चौगुले, सतीश चौगुले आदी सहभागी होते.

कारखानदारांनी ११० कोटी शेतकऱ्यांचे लाटले : संदीप राजोबाजिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कोल्हापूर पॅटर्नची अंमलबजावणी केली नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ११० कोटी रुपये लाटले आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केला आहे. कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे ११० कोटी रुपये मिळविण्यासाठी आंदोलनाचा लढा आमचा चालूच असणार आहे, असेही राजोबा म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना