शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव कारखान्याच्या एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 18:27 IST

Swabimani Shetkari Sanghatna Sangli- तासगाव साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2850 रुपये एकरकमी एफआरपी द्यावी अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली. कारखाना प्रशासनानें अन्य कारखान्यांच्या बरोबरीने निर्णय घेणार असल्याची भूमिका घेतली. मात्र मागणी मान्य न झाल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

ठळक मुद्देतासगाव कारखान्याच्या एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक बैठक निष्फळ : मागणी मान्य न केल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलनाचा इशारा

तासगाव : तासगाव साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2850 रुपये एकरकमी एफआरपी द्यावी अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली. कारखाना प्रशासनानें अन्य कारखान्यांच्या बरोबरीने निर्णय घेणार असल्याची भूमिका घेतली. मात्र मागणी मान्य न झाल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत तासगाव पोलीस ठाण्यात, तासगाव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर डी पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची समन्वयाबाबत बैठक झाली. मात्र या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी शेतकऱ्यांना 2850 रुपये याप्रमाणे एकरकमी एफआरपी देण्याची आक्रमक भूमिका घेतली. कारखाना प्रशासनाने कोणतेही कारण न देता शेतकऱ्यांची बांधिलकी ठेवून शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घ्यायला हवी. सोनहिरा, उदगीर, दालमिया या कारखाने शेतकऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तासगाव कारखान्यांनी ही एकरकमी एफआरपी द्यायलाच हवी अशी भूमिका घेतली. कारखान्याचे कार्यकारी संचालक आर डी पाटील यांनी अन्य कारखान्यांच्या प्रमाणे तासगाव कारखाना ही निर्णय घेऊन शेतकरी हिताचा निर्णय घेईल अशी भूमिका घेतली.

कारखान्याकडून एकरकमी एफआरपी देण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. एकरकमी एफआरपी न मिळाल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करून शेतकऱ्यांचे हित साधले जाईल, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष जोतीराम जाधव यांनी यावेळी दिला. बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ झाली.पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी कायदा व सुव्यवस्था राखून शेतकऱ्यांचे हित साधले जावे असे आवाहन केले. बैठकीस दामाजी डुबल ,धन्यकुमार पाटील ,सुधीर जाधव ,संदेश पाटील शशिकांत माने, माणिक शिरोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSangliसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळSugar factoryसाखर कारखाने