शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

स्वाभिमानी कार्यकर्ते, पोलिसांत जोरदार झटापट : कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 17:41 IST

Swabimani Shetkari Sanghatna SugerFactory Sangli-एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दत्त इंडिया कंपनीच्या वसंतदादा कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्यासाठी मोर्चा काढला होता. मोठा पोलीस फौजफाटा तैनात केल्यामुळे कारखान्याबाहेरच कार्यकर्त्यांना बॅरिकेटस् लावून रोखले.

ठळक मुद्देगव्हाणीत उड्या मारण्यासाठी बॅरिकेटस्‌ ओलांडण्याचा प्रयत्नदत्त इंडियाकडून एकरकमी एफआरपीचे आश्वासन

सांगली : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दत्त इंडिया कंपनीच्या वसंतदादा कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्यासाठी मोर्चा काढला होता. मोठा पोलीस फौजफाटा तैनात केल्यामुळे कारखान्याबाहेरच कार्यकर्त्यांना बॅरिकेटस् लावून रोखले.

आक्रमक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेटस् ओलांडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. अखेर दत्त इंडियाच्या प्रशासनाने एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.जिल्ह्यातील कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एफआरपीबाबत कडेगाव येथे बैठक झाली होती. या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचे सर्वच साखर कारखानदारांनी मान्य केले होते. गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाल्यानंतर सोनहिरा, उदगिरी शुगर आणि दालमिया या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली आहे. उर्वरित एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी न देता दोन, तीन हप्त्यांमध्ये बिल देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.वसंतदादा कारखाना चालवित असलेल्या दत्त इंडिया कारखान्यानेही पहिला हप्ता दोन हजार ५०० रुपये दिला असून, उर्वरित ३९२ रुपयांचा दुसरा हप्ता प्रलंबित आहे. याप्रकरणी दत्त इंडिया कंपनी प्रशासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी गव्हाणीत उड्या मारणार असल्याचे निवेदन दिले होते.

तरीही कारखाना प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नव्हती. म्हणून अखेर शुक्रवारी महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकाव्याने दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्यासाठी प्रयत्न केला; पण कारखान्याच्या सर्व बाजूला कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता.

बॅरिकेटस्‌ लावून रस्ता अडवला होता. दुपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कारखान्याच्या मुख्य गेटवरच पोलिसांनी अडवले. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, व्यवस्थापक शरद मोरे यांनी आंदोलनस्थळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी उर्वरित बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दिवसांत वर्ग केली जातील. तसेच यापुढील ऊस गाळपास येणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमीच एफआरपी दिली जाईल, असे आश्वासन दिले.

आंदोलनात संदीप राजोबा, पोपट मोरे, संजय बेले, भागवत जाधव, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, राजेंद्र माने, बाळासाहेब जाधव, महेश जगताप, राजू परीट, प्रताप पाटील, संतोष शेळके, काशिनाथ निंबाळकर, मारुती देवकर, दीपक मगदूम आदींसह शेतकरी सहभागी होते.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखानेSangliसांगली