शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी मोदींना साथ द्या, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:01 IST

७० वर्षांच्या काळात विकासापेक्षा राजकारण जास्त झाले

इस्लामपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्रातून आलेल्या सर्व योजना ठप्प होत्या. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नव्हते. राज्यात भाजप-सेनेचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. देशाला जागतिक स्तरावरील आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या, असे आवाहन केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी केले.कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे पक्षप्रभारी म्हणून सिंधिया हे वाळवा आणि शिराळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.पेठनाका येथे त्यांनी महाडिक शैक्षणिक संकुलातील नवमतदार असलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. देशाचे भविष्य तरुणाईच्या हाती आहे. त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.सिंधिया म्हणाले, ७० वर्षांच्या काळात विकासापेक्षा राजकारण जास्त झाले. शेतकरी, महिलांच्या हाती काहीच पडले नाही. मात्र गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि प्रगतीचा विचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविला जात आहे.विक्रम पाटील म्हणाले, शहरामध्ये पक्षावर निष्ठा असणारी शेकडो घरे आहेत. या सर्वांना सोबत घेत पक्षाचे संघटन वाढवत आहोत.यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, समरजितसिंह घाटगे, मकरंद देशपांडे, राहुल महाडिक, निशिकांत पाटील, माजी आमदार भगवानराव साळुुंखे, सी. बी. पाटील, जयसिंगराव शिंदे, जयराज पाटील, जयकर पाटील, श्रीकांत शिंदे, महेश पाटील, सागर खोत उपस्थित होते.युवकांचा विश्वाससम्राट महाडिक म्हणाले, युवकांना विश्वास देत त्यांना सोबत घेऊन देशाचा विकास साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. त्याला युवकांनी साथ द्यावी.

टॅग्स :SangliसांगलीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी