शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

Sugarcane: शेतातील शिल्लक ऊस जाणार तरी कधी? बळीराजाला सतावतेय चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 21:54 IST

शेतकऱ्यांना चिंता : नऊ कारखान्यांचे गाळप ३१ मार्चला होणार बंद, १५ लाख टन ऊस शिल्लक

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यात १५ लाख २१६४ टन ऊस शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्यामुळे ऊसतोड मजुरांना परतीचे वेध लागले आहेत. यातच शिल्लक उसाचा प्रश्न भेडसावत आहे. साखर कारखानदारांनी शंभर टक्के उसाचे गाळप करूनच हंगाम बंद करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. तेरा कारखान्यांचा ३१ मार्चपर्यंत, तर चार कारखान्यांचा हंगाम १५ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

जिल्ह्यातील १८ कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचा गळीत हंगाम बंद राहिला. यातच उसाचे क्षेत्रही २० टक्क्यांनी वाढले. तेराच कारखान्यांचा हंगाम सुरू राहिल्यामुळे शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिराळा तालुक्यात शिल्लक उसाचा फारसा प्रश्न नाही. शिल्लक ऊस जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज तालुक्यात सर्वाधिक आहे. सध्या या ठिकाणी कर्नाटकातील अथणी, शिवशक्ती, उगार शुगरसह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सात कारखान्यांची तोड सुरू आहे. पलूस, कडेगाव तालुक्यातही साडेसहा लाख टन ऊस शिल्लक असून, तो संपविण्यासाठी क्रांती, सोनहिरा, उदगिरी शुगर कारखाना व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत.

वाळवा, मिरज, पलूस तालुक्यातील हुतात्मा, राजारामबापू, वारणा कारखान्यांचीही तोड दाखल आहे. शिल्लक ऊस संपवून जिल्ह्यातील तेरा कारखान्यांपैकी नऊ कारखान्यांचा गळीत हंगाम दि. ३१ मार्चला बंद होणार आहे. उर्वरित क्रांती, सोनहिरा, उदगिरी शुगर आणि श्रीश्री रवीशंकर या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात शिल्लक ऊस जास्त असल्यामुळे ते दि. १५ एप्रिलपर्यंत चालणार आहेत.

जिल्ह्यातील शिल्लक ऊस

तालुका शिल्लक ऊसवाळवा ३२४०००

पलूस ३२६२२३कडेगाव ३२१५४०

खानापूर ५२१०२क. महांकाळ ११२०००

जत    ७०२९९आटपाडी ४५०००

मिरज १५००००तासगाव १०१०००

एकूण १५०२१६४

जिल्ह्यात शिल्लक उसाचा प्रश्न फारसा निर्माण होणार नाही. खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळमध्येच शिल्लक उसाचा प्रश्न आहे; पण तेथेही कर्नाटकातील चार कारखान्यांसह आमचीही तोड तेथे आहे. ३१ मार्चपूर्वी सर्व उसाचे गाळप होईल. शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही.-आर. डी. माहुली, व्यवस्थापकीय संचालक, राजारामबापू कारखाना.

७७ लाख टन उसाचे गाळप

जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी शनिवार, दि. ५ मार्चपर्यंत ७७ लाख टन उसाचे गाळप करून ८५ लाख ३१ हजार ३५१ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. हंगामात सरासरी उतारा ११.१९ टक्केच राहिला आहे. कारखान्यांच्या साखर उताऱ्यातील चोरीचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या संघटना गप्प आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीSangliसांगली