शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

Sugarcane: शेतातील शिल्लक ऊस जाणार तरी कधी? बळीराजाला सतावतेय चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 21:54 IST

शेतकऱ्यांना चिंता : नऊ कारखान्यांचे गाळप ३१ मार्चला होणार बंद, १५ लाख टन ऊस शिल्लक

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यात १५ लाख २१६४ टन ऊस शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्यामुळे ऊसतोड मजुरांना परतीचे वेध लागले आहेत. यातच शिल्लक उसाचा प्रश्न भेडसावत आहे. साखर कारखानदारांनी शंभर टक्के उसाचे गाळप करूनच हंगाम बंद करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. तेरा कारखान्यांचा ३१ मार्चपर्यंत, तर चार कारखान्यांचा हंगाम १५ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

जिल्ह्यातील १८ कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचा गळीत हंगाम बंद राहिला. यातच उसाचे क्षेत्रही २० टक्क्यांनी वाढले. तेराच कारखान्यांचा हंगाम सुरू राहिल्यामुळे शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिराळा तालुक्यात शिल्लक उसाचा फारसा प्रश्न नाही. शिल्लक ऊस जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज तालुक्यात सर्वाधिक आहे. सध्या या ठिकाणी कर्नाटकातील अथणी, शिवशक्ती, उगार शुगरसह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सात कारखान्यांची तोड सुरू आहे. पलूस, कडेगाव तालुक्यातही साडेसहा लाख टन ऊस शिल्लक असून, तो संपविण्यासाठी क्रांती, सोनहिरा, उदगिरी शुगर कारखाना व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत.

वाळवा, मिरज, पलूस तालुक्यातील हुतात्मा, राजारामबापू, वारणा कारखान्यांचीही तोड दाखल आहे. शिल्लक ऊस संपवून जिल्ह्यातील तेरा कारखान्यांपैकी नऊ कारखान्यांचा गळीत हंगाम दि. ३१ मार्चला बंद होणार आहे. उर्वरित क्रांती, सोनहिरा, उदगिरी शुगर आणि श्रीश्री रवीशंकर या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात शिल्लक ऊस जास्त असल्यामुळे ते दि. १५ एप्रिलपर्यंत चालणार आहेत.

जिल्ह्यातील शिल्लक ऊस

तालुका शिल्लक ऊसवाळवा ३२४०००

पलूस ३२६२२३कडेगाव ३२१५४०

खानापूर ५२१०२क. महांकाळ ११२०००

जत    ७०२९९आटपाडी ४५०००

मिरज १५००००तासगाव १०१०००

एकूण १५०२१६४

जिल्ह्यात शिल्लक उसाचा प्रश्न फारसा निर्माण होणार नाही. खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळमध्येच शिल्लक उसाचा प्रश्न आहे; पण तेथेही कर्नाटकातील चार कारखान्यांसह आमचीही तोड तेथे आहे. ३१ मार्चपूर्वी सर्व उसाचे गाळप होईल. शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही.-आर. डी. माहुली, व्यवस्थापकीय संचालक, राजारामबापू कारखाना.

७७ लाख टन उसाचे गाळप

जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी शनिवार, दि. ५ मार्चपर्यंत ७७ लाख टन उसाचे गाळप करून ८५ लाख ३१ हजार ३५१ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. हंगामात सरासरी उतारा ११.१९ टक्केच राहिला आहे. कारखान्यांच्या साखर उताऱ्यातील चोरीचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या संघटना गप्प आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीSangliसांगली