शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगली जिल्ह्यातील ऊस दराची बैठक निष्फळ; कारखानदारांचा निर्णय ‘स्वाभिमानी’ला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 11:52 IST

राजू शेट्टींशी चर्चा करणार

कडेगाव : सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन तीन हजार १०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखानदारांनी घेतलेला निर्णय अमान्य असल्याचे सांगत काेल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही ताेडगा हवा, अशी मागणी केली.कडेगाव येथे रविवारी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने सांगली जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक झाली. बैठकीस खासदार संजय पाटील, क्रांती कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार अरुण लाड, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, उदगिरी शुगरचे उत्तमराव पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, दत्त इंडियाचे जितेंद्र धारू, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी उपस्थित होते.ज्या साखर कारखान्यांनी मागील वर्षी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रतिटन २ हजार ९०० पेक्षा जादा दर अदा केलेला आहे. त्यांनी प्रति टन ५० रुपये व २ हजार ९०० पेक्षा कमी दर अदा केलेल्या कारखान्यांनी मागील वर्षाच्या एफआरपीपेक्षा किमान रुपये १०० रुपये जादा अदा करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव दाखल द्यावा. शासन स्तरावरून मंजुरी मिळाल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी, तसेच चालू गळीत हंगामात ३१०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

‘स्वाभिमानी’कडून कोल्हापूर पॅटर्नची मागणीकडेगाव येथे साखर कारखानदारांची बैठक झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विश्वजित कदम यांची भेट घेतली. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे कारखानदारांनी एफआरपी अधिक शंभर रुपये चालू वर्षीचा ऊसदर जाहीर करावा. तसेच मागील वर्षी तीन हजारपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी १०० रुपये जादा अदा करावे व तीन हजारपेक्षा जादा दर दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये जादा अदा करावे, अशी मागणी खराडे व राजोबा यांनी कदम यांच्याकडे केली.

राजू शेट्टींशी चर्चा करणारकारखानदारांच्या वतीने आमदार विश्वजित कदम हे तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. रविवारच्या बैठकीतील निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अमान्य आहे. यावर कदम यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखानदार व खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कडेगावातील बैठकीत कारखानदारांनी घेतलेला निर्णय आम्हाला अमान्य आहे. सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत त्यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत. - संदीप राजोबा, कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने