शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'स्वाभिमानी'ची जयसिंगपूरमध्ये उद्या ऊस परिषद, सांगलीतून २५ हजार शेतकरी जाणार

By अशोक डोंबाळे | Updated: November 6, 2023 12:30 IST

मागील हिशोब चुकता न केल्यास कारखानदार-शेतकऱ्यांत संघर्ष अटळ

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बाविसावी ऊस परिषद मंगळवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होत आहे. या परिषदेच्या तयारीमध्ये कार्यकर्ते व्यस्त असून, सांगली जिल्ह्यातून २५ हजार शेतकरी जाणार आहेत, असा विश्वास स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी व्यक्त केला.खराडे म्हणाले, जयसिंगपूर येथील विक्रमसिंह घाटगे मैदानावर मंगळवारी दुपारी २ वाजता ऊस परिषद होणार आहे. परिषदेला माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, संदीप जगताप, सावकार माडणाईक मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेला राज्यभरातील एक लाख शेतकरी उपस्थित राहतील, असा अंदाज घेऊन कार्यकर्ते नियोजन करत आहेत. या ऊस परिषदेत यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांकडून किती ऊस दर घ्यायचा हे जाहीर होणार आहे. उसाचा वाढता उत्पादन खर्च, उसाची टंचाई, साखरेची टंचाई, जगभरात वाढत जाणारे साखरेचे दर या सर्व बाबींचा विचार करून यंदा ऊस दर जाहीर केला जाईल. ऊस परिषदेत ठरलेला दर देण्याची तयारी जे साखर कारखाने दर्शवितील तेच कारखाने सुरू राहतील, अन्य सर्व साखर कारखान्यांची ऊसतोड बंद पाडणार आहे, तसेच मागील गळीत हंगामासाठी गेलेल्या उसाला प्रतिटन चारशे रुपये दिले पाहिजेत, यासाठीही लढा सुरूच असणार आहे.

ऊसटंचाई, तोडीसाठी गडबड नकोशेतकऱ्यांनी ऊस दराचा प्रश्न सुटल्याशिवाय ऊस तोडी घेऊ नयेत, कारण यंदा उसाची प्रचंड टंचाई आहे. साखर कारखान्यांमध्ये ऊस नेण्यासाठी स्पर्धा लागणार आहे. त्यामुळे या परिस्थितीचा फायदा उठवून चांगला ऊस दर मिळू शकतो; पण त्यासाठी शेतकऱ्यांनी दोन आठवडे ऊसतोडी घेतल्या नाहीत, तर वाढीव ऊस दराची लढाई जिंकता येणार आहे. वाहनधारकांनीही ऊस वाहतूक करू नये, वाहनधारकांच्या अडचणीच्या काळात संघटनाच त्यांच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक आणि वाहनधारकांनी जरा सबुरीने घ्यावे, असे आवाहन खराडे यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी