शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाभिमानी'ची जयसिंगपूरमध्ये उद्या ऊस परिषद, सांगलीतून २५ हजार शेतकरी जाणार

By अशोक डोंबाळे | Updated: November 6, 2023 12:30 IST

मागील हिशोब चुकता न केल्यास कारखानदार-शेतकऱ्यांत संघर्ष अटळ

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बाविसावी ऊस परिषद मंगळवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होत आहे. या परिषदेच्या तयारीमध्ये कार्यकर्ते व्यस्त असून, सांगली जिल्ह्यातून २५ हजार शेतकरी जाणार आहेत, असा विश्वास स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी व्यक्त केला.खराडे म्हणाले, जयसिंगपूर येथील विक्रमसिंह घाटगे मैदानावर मंगळवारी दुपारी २ वाजता ऊस परिषद होणार आहे. परिषदेला माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, संदीप जगताप, सावकार माडणाईक मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेला राज्यभरातील एक लाख शेतकरी उपस्थित राहतील, असा अंदाज घेऊन कार्यकर्ते नियोजन करत आहेत. या ऊस परिषदेत यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांकडून किती ऊस दर घ्यायचा हे जाहीर होणार आहे. उसाचा वाढता उत्पादन खर्च, उसाची टंचाई, साखरेची टंचाई, जगभरात वाढत जाणारे साखरेचे दर या सर्व बाबींचा विचार करून यंदा ऊस दर जाहीर केला जाईल. ऊस परिषदेत ठरलेला दर देण्याची तयारी जे साखर कारखाने दर्शवितील तेच कारखाने सुरू राहतील, अन्य सर्व साखर कारखान्यांची ऊसतोड बंद पाडणार आहे, तसेच मागील गळीत हंगामासाठी गेलेल्या उसाला प्रतिटन चारशे रुपये दिले पाहिजेत, यासाठीही लढा सुरूच असणार आहे.

ऊसटंचाई, तोडीसाठी गडबड नकोशेतकऱ्यांनी ऊस दराचा प्रश्न सुटल्याशिवाय ऊस तोडी घेऊ नयेत, कारण यंदा उसाची प्रचंड टंचाई आहे. साखर कारखान्यांमध्ये ऊस नेण्यासाठी स्पर्धा लागणार आहे. त्यामुळे या परिस्थितीचा फायदा उठवून चांगला ऊस दर मिळू शकतो; पण त्यासाठी शेतकऱ्यांनी दोन आठवडे ऊसतोडी घेतल्या नाहीत, तर वाढीव ऊस दराची लढाई जिंकता येणार आहे. वाहनधारकांनीही ऊस वाहतूक करू नये, वाहनधारकांच्या अडचणीच्या काळात संघटनाच त्यांच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक आणि वाहनधारकांनी जरा सबुरीने घ्यावे, असे आवाहन खराडे यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी