शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

गळीत हंगामापूर्वीच साखर कामगारांचा एल्गार -: पगारवाढीकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 21:37 IST

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील साखर कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवार, दि. ५ रोजी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू होण्यापूर्वी आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला आहे.

ठळक मुद्दे सांगली, कोल्हापुरात बैठकीचे आयोजन

सांगली : साखर कारखान्यांची धुराडी पेटण्यापूर्वीच साखर कामगारांच्या आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. वेतन करार संपूनही शासनाने समिती गठित केली नाही. या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्यामुळे कामगारांनी दि. २० नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथे मंगळवारी साखर कामगारांच्या राज्यस्तरीय समितीची बैठक झाली असून, त्यामध्ये हा निर्णय झाला आहे.

 

२०१४ मध्ये वेतनवाढ करार झाला होता. त्याची अंमलबजावणी दोन वर्षांनंतर झाली. यामुळे काही कामगारांना दोन वर्षांच्या वेतनवाढ फरकावर पाणी सोडावे लागले होते. याबद्दलही नाराजी होती. शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन करार संपण्यापूर्वीच नवा करार मंजूर होतो; परंतु साखर कामगारांबाबत तसे होत नाही.

साखर कामगारांच्या मूळ वेतनात ३० टक्के वाढ, अंतिम करार होईपर्यंत तीन हजार रुपये दरमहा अंतरिम वाढ, हंगामी कामगारांना १ एप्रिल २०१९ च्या वेतनात महागाई भत्ता, मूळ वेतनात समावेश करून वेतनश्रेणी, ७५ टक्के रिटेन्शन अलाउन्स, रोजंदारी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे एकूण पगार २६ दिवसांचा काढण्यात यावा व वर्षाच्या पुढे कोणत्याही कामगारास रोजंदारीवर ठेवू नये (कायम करावे), १३ जानेवारी १९९० च्या करारामधील कर्करोग, हृदयविकार, अर्धांगवायू यांसारख्या असाध्य आजारपणात संपूर्ण खर्च व एक वर्षाची पगारी रजा देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी करावी, साखर उद्योगातील कंत्राटी पद्धत रद्द करावी, कारखान्यातील अपघातात खास पगारी रजा व सर्व औषधोपचार खर्च द्यावा, अशा मागण्या करून राज्य-राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनने त्रिपक्षीय समिती नेमण्याचा आग्रह फेब्रुवारी २०१९ मध्ये शासनाकडे धरला होता. मात्र शासनाने साखर कामगारांच्या मागण्यांबाबत कोणताच निर्णय घेतला नाही.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील साखर कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवार, दि. ५ रोजी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू होण्यापूर्वी आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी १८ नोव्हेंबररोजी कोल्हापूर येथे, तर दि. २० नोव्हेंबररोजी सांगलीत साखर कामगारांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाची रूपरेषा ठरणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेMONEYपैसाGovernmentसरकार