शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गळीत हंगामापूर्वीच साखर कामगारांचा एल्गार -: पगारवाढीकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 21:37 IST

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील साखर कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवार, दि. ५ रोजी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू होण्यापूर्वी आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला आहे.

ठळक मुद्दे सांगली, कोल्हापुरात बैठकीचे आयोजन

सांगली : साखर कारखान्यांची धुराडी पेटण्यापूर्वीच साखर कामगारांच्या आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. वेतन करार संपूनही शासनाने समिती गठित केली नाही. या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्यामुळे कामगारांनी दि. २० नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथे मंगळवारी साखर कामगारांच्या राज्यस्तरीय समितीची बैठक झाली असून, त्यामध्ये हा निर्णय झाला आहे.

 

२०१४ मध्ये वेतनवाढ करार झाला होता. त्याची अंमलबजावणी दोन वर्षांनंतर झाली. यामुळे काही कामगारांना दोन वर्षांच्या वेतनवाढ फरकावर पाणी सोडावे लागले होते. याबद्दलही नाराजी होती. शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन करार संपण्यापूर्वीच नवा करार मंजूर होतो; परंतु साखर कामगारांबाबत तसे होत नाही.

साखर कामगारांच्या मूळ वेतनात ३० टक्के वाढ, अंतिम करार होईपर्यंत तीन हजार रुपये दरमहा अंतरिम वाढ, हंगामी कामगारांना १ एप्रिल २०१९ च्या वेतनात महागाई भत्ता, मूळ वेतनात समावेश करून वेतनश्रेणी, ७५ टक्के रिटेन्शन अलाउन्स, रोजंदारी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे एकूण पगार २६ दिवसांचा काढण्यात यावा व वर्षाच्या पुढे कोणत्याही कामगारास रोजंदारीवर ठेवू नये (कायम करावे), १३ जानेवारी १९९० च्या करारामधील कर्करोग, हृदयविकार, अर्धांगवायू यांसारख्या असाध्य आजारपणात संपूर्ण खर्च व एक वर्षाची पगारी रजा देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी करावी, साखर उद्योगातील कंत्राटी पद्धत रद्द करावी, कारखान्यातील अपघातात खास पगारी रजा व सर्व औषधोपचार खर्च द्यावा, अशा मागण्या करून राज्य-राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनने त्रिपक्षीय समिती नेमण्याचा आग्रह फेब्रुवारी २०१९ मध्ये शासनाकडे धरला होता. मात्र शासनाने साखर कामगारांच्या मागण्यांबाबत कोणताच निर्णय घेतला नाही.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील साखर कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवार, दि. ५ रोजी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू होण्यापूर्वी आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी १८ नोव्हेंबररोजी कोल्हापूर येथे, तर दि. २० नोव्हेंबररोजी सांगलीत साखर कामगारांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाची रूपरेषा ठरणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेMONEYपैसाGovernmentसरकार