शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

सांगली जिल्ह्यात साखरेचे उत्पादन १९ लाख क्विंटलने घटले, गळीत हंगामाची सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:42 IST

साखर उताऱ्यातही घट : दीड महिन्यापासून शेतकऱ्यांना बिल मिळाले नाहीत

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ७७ लाख ६ हजार ३६४ टन उसाचे गाळप करून ८१ लाख ४६ हजार ५४० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. पण, २०२३-२४ च्या गळीत हंगामाच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये १८ लाख ९५ हजार ३४६ क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यातही ०.६६ टक्के घट झाली आहे. दरम्यान, कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही गेल्या दीड महिन्यापासून उसाची बिले शेतकऱ्यांना मिळाली नसल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी २०२३-२४ च्या गळीत हंगामामध्ये ८८ लाख ८३ हजार २४५ टन उसाचे गाळप करून १ कोटी ४१ हजार ८८६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. साखरेचा सरासरी उतारा ११.१२ टक्के होता. २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्येही जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होते. पण, उसाची उपलब्धता कमी झाल्यामुळे त्याचा कारखान्यांच्या गाळपावर परिणाम झाला आहे. सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. या कारखान्यांनी ७७ लाख ६६ हजार ३६४ टन उसाचे गाळप झाले असून ८१ लाख ४६ हजार ५४० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १८ लाख ९५ हजार ३४६ क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. २०२३-२४ मध्ये साखरेचा सरासरी उतारा ११.१२ टक्के असून यामध्ये ०.६६ टक्क्यांनी घट होऊन २०२४-२५ च्या गळीत हंगामात १०.४६ टक्के राहिला आहे. साखर उतारा घटल्यामुळे त्यांचा परिणाम एफआरपी निश्चित करण्यावर होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

साखर कारखान्यांचे गळीत हंगाम संपले आहेत. तरीही बहुतांशी कारखान्यांनी १ फेब्रवारी ते २५ मार्चपर्यंत गाळपास गेलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना दिली नाहीत. ही रक्कम ४०० ते ५०० कोटींहून जास्त असण्याची शक्यता आहे.

कारखान्यांची बिल न मिळाल्यामुळे कर्ज थकबाकीत : संदीप राजोबासाखर कारखान्यांनी ऊस गळितास गेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत. पण, कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही शेतकऱ्यांना गेल्या दीड महिन्यापासून पैसेच दिले नाहीत. शेतकऱ्यांची कर्ज थकबाकीत गेल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा आणखी वाढणार आहे. यास साखर कारखानदार जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने