शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

..'तर साखर कारखान्यांच्या अध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या मारु'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 17:37 IST

जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत.

सांगली : जिल्ह्यात अद्याप सुमारे २० ते २५ हजार हेक्टरवरील तोडणी आणि गाळप होईपर्यंत साखर कारखाने बंद करू नयेत अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे. कारखाने बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.खराडे म्हणाले, जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत, मात्र त्याचेही गाळप झालेच पाहिजे.ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, विसापूर, पुणदी सिंचन योजना सुरू झाल्याने दुष्काळी भागात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊस वाढला तरी तासगाव, नागेवाडी, महांकाली आणि माणगंगा केन ॲग्रो कारखाने बंद आहेत. त्यामुळे ऊसाच्या संपुर्ण गाळपात अडचणी आहेत.ऊस शिल्लक राहण्याची शक्यता असल्याची बाब साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निदर्शनास यापूर्वीच आणून दिली होती. त्यानुसार त्यांनी सर्व कारखान्यांना आवश्यक सूचनाही दिल्या होत्या. तरीही काही कारखान्यांनी गाळप हंगामाच्या सांगतेची तयारी सुरू केली आहे. सांगलीतील दत्त इंडिया तथा वसंतदादा साखर कारखान्याने ३१ मार्चला कारखाना बंदचे जाहीर निवेदन दिले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घ्यावा. सर्व कारखानदारांची बैठक घेऊन १०० टक्के ऊसाच्या गाळफाचे आदेश द्यावेत. तोपर्यंत कारखाने बंद करू नयेत असेही आदेश द्यावेत.... तर कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर आंदोलनगाळपापूर्वीच कारखाने बंद करणाऱ्या कारखान्यांच्या अध्यक्षाच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा खराडे यांनी दिला. तशी वेळ येऊ नये यासाठी कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊसाच्या कांड्याचे गाळप होईल याची दक्षता घ्यावी असे ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना