शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

..'तर साखर कारखान्यांच्या अध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या मारु'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 17:37 IST

जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत.

सांगली : जिल्ह्यात अद्याप सुमारे २० ते २५ हजार हेक्टरवरील तोडणी आणि गाळप होईपर्यंत साखर कारखाने बंद करू नयेत अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे. कारखाने बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.खराडे म्हणाले, जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत, मात्र त्याचेही गाळप झालेच पाहिजे.ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, विसापूर, पुणदी सिंचन योजना सुरू झाल्याने दुष्काळी भागात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊस वाढला तरी तासगाव, नागेवाडी, महांकाली आणि माणगंगा केन ॲग्रो कारखाने बंद आहेत. त्यामुळे ऊसाच्या संपुर्ण गाळपात अडचणी आहेत.ऊस शिल्लक राहण्याची शक्यता असल्याची बाब साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निदर्शनास यापूर्वीच आणून दिली होती. त्यानुसार त्यांनी सर्व कारखान्यांना आवश्यक सूचनाही दिल्या होत्या. तरीही काही कारखान्यांनी गाळप हंगामाच्या सांगतेची तयारी सुरू केली आहे. सांगलीतील दत्त इंडिया तथा वसंतदादा साखर कारखान्याने ३१ मार्चला कारखाना बंदचे जाहीर निवेदन दिले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घ्यावा. सर्व कारखानदारांची बैठक घेऊन १०० टक्के ऊसाच्या गाळफाचे आदेश द्यावेत. तोपर्यंत कारखाने बंद करू नयेत असेही आदेश द्यावेत.... तर कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर आंदोलनगाळपापूर्वीच कारखाने बंद करणाऱ्या कारखान्यांच्या अध्यक्षाच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा खराडे यांनी दिला. तशी वेळ येऊ नये यासाठी कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊसाच्या कांड्याचे गाळप होईल याची दक्षता घ्यावी असे ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना