शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

‘डिप्लोमा’साठी मिळेनात विद्यार्थी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 16:25 IST

दहावीच्या निकालानंतर अकरावीसह इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू   झाली असली तरी, यंदा विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण घटल्याने,

ठळक मुद्देअभ्यासक्रमावेळी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे

सांगली : दहावीच्या निकालानंतर अकरावीसह इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू   झाली असली तरी, यंदा विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण घटल्याने, त्याचा सर्वच प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होणार आहे. त्यातच दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांसह पालकांचाही आयटीआयकडे ओढा वाढल्याने अभियांत्रिकीच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळविताना अनेक महाविद्यालयांची कसरत होणार आहे.

गेल्या काही वर्षांपर्यंत दहावीनंतर अभियांत्रिकीमधील पदविका अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जात होते. पदविकेनंतर पदवीला थेट दुसºया वर्षात मिळणारा प्रवेश आणि अनुभवामुळे पदविका अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळत होते. आता मात्र, परिस्थिती बदलली असून पदविका अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांचा पदवीकडे ओढा असल्याने अनेकजण बारावीनंतरच प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत. 

यंदा जिल्ह्यातील ११ हजारावर अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. एकीकडे अकरावीच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहणार असल्याने पदविकेसाठी विद्यार्थी मिळण्यास अडचणी येण्याची चिन्हे आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पदविका अभ्यासक्रमावर चांगल्या पगाराची नोकरी लागू शकते. तरीही पालकांची मानसिकता बदलत आहे. मुलाने बारावीनंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे यासाठीची मानसिकता पालकांकडून वाढत आहे. त्यामुळे नोकरीच्या चांगल्या संधी असतानाही विद्यार्थी कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची वानवा आहे.

पदविका केल्यानंतर पदवीला प्रवेश घेणे हा एकमेवच पर्याय आहे. अभ्यासक्रम कालबाह्य बनत चालल्याने पदवी अभ्यासक्रमावेळी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी पदविकेतून पदवीला कोटा २० टक्क्यांचा होता, तो १० टक्क्यांवर आला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSangliसांगलीEducationशिक्षण