शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘डिप्लोमा’साठी मिळेनात विद्यार्थी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 16:25 IST

दहावीच्या निकालानंतर अकरावीसह इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू   झाली असली तरी, यंदा विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण घटल्याने,

ठळक मुद्देअभ्यासक्रमावेळी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे

सांगली : दहावीच्या निकालानंतर अकरावीसह इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू   झाली असली तरी, यंदा विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण घटल्याने, त्याचा सर्वच प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होणार आहे. त्यातच दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांसह पालकांचाही आयटीआयकडे ओढा वाढल्याने अभियांत्रिकीच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळविताना अनेक महाविद्यालयांची कसरत होणार आहे.

गेल्या काही वर्षांपर्यंत दहावीनंतर अभियांत्रिकीमधील पदविका अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जात होते. पदविकेनंतर पदवीला थेट दुसºया वर्षात मिळणारा प्रवेश आणि अनुभवामुळे पदविका अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळत होते. आता मात्र, परिस्थिती बदलली असून पदविका अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांचा पदवीकडे ओढा असल्याने अनेकजण बारावीनंतरच प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत. 

यंदा जिल्ह्यातील ११ हजारावर अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. एकीकडे अकरावीच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहणार असल्याने पदविकेसाठी विद्यार्थी मिळण्यास अडचणी येण्याची चिन्हे आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पदविका अभ्यासक्रमावर चांगल्या पगाराची नोकरी लागू शकते. तरीही पालकांची मानसिकता बदलत आहे. मुलाने बारावीनंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे यासाठीची मानसिकता पालकांकडून वाढत आहे. त्यामुळे नोकरीच्या चांगल्या संधी असतानाही विद्यार्थी कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची वानवा आहे.

पदविका केल्यानंतर पदवीला प्रवेश घेणे हा एकमेवच पर्याय आहे. अभ्यासक्रम कालबाह्य बनत चालल्याने पदवी अभ्यासक्रमावेळी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी पदविकेतून पदवीला कोटा २० टक्क्यांचा होता, तो १० टक्क्यांवर आला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSangliसांगलीEducationशिक्षण