शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

करसल्लागार एजन्सी नेमण्यास सरपंच परिषदेचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 12:07 IST

Zp Grampanchyat sangli: ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करसल्ल्यासाठी एजन्सी नियुक्तीस सरपंच परिषदेने विरोध केला आहे. पथदिवे आणि पाणीयोजनांचे वीजबील पंधराव्या वित्त आयोगातून भरण्यासही परिषदेने नकार दिला आहे. राज्यभरात विविध जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तशी निवेदने दिली आहेत.

ठळक मुद्देकरसल्लागार एजन्सी नेमण्यास सरपंच परिषदेचा तीव्र विरोधवित्त आयोगाला फुटले पाय

सांगली : ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करसल्ल्यासाठी एजन्सी नियुक्तीस सरपंच परिषदेने विरोध केला आहे. पथदिवे आणि पाणीयोजनांचे वीजबील पंधराव्या वित्त आयोगातून भरण्यासही परिषदेने नकार दिला आहे. राज्यभरात विविध जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तशी निवेदने दिली आहेत.परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्ष अनिल गिते, सरचिटणीस ॲड. विकास जाधव, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा राणीताई पाटील यांनी निवेदन दिले आहे. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांना करसल्ल्यासाठी वर्षाला लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे पैसे पंधराव्या वित्त आयोगातून खर्ची पडतील, त्याचा परिणाम विकासकामांवर होईल. गावाच्या हक्काचा पैसा एखाद्या एजन्सीला विनाकारण द्यावा लागेल. सध्या स्थानिक लेखा परिक्षकांकडून अत्यल्प पैशांत ग्रामपंचायती लेखापरिक्षण व करसेवा घेतात. तीच पद्धती पुढेदेखील सुरु रहावी. खासगी एजन्सीचा निर्णय रद्द करावा.पथदिवे आणि पाणीयोजनांची वीजबिले पंधराव्या वित्त आयोगातून भरण्याचे आदेश शासनाने नुकतेच काढले आहेत. तेदेखील योग्य नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे वसुली ठप्प झाली आहे. गावांतील विकासकामे वित्त आयोगातील निधीवरच अवलंबून आहेत. या निधीची अशी विल्हेवाट लावल्यास विकासकामे करता येणार नाहीत. यापूर्वी वीजबिले शासन भरत होते, ते पुढेही सुरु ठेवावे.ग्रामपंचायतींच्या विविध ठेक्यांसाठी शासन परस्पर एजन्सींची नियुक्ती करते आणि त्यांचे पैसेही अनेकदा परस्पर वळते केले जातात. त्यामुळे वित्त आयोगातून राहिलेल्या तुटपुंज्या पैशांत गावांचा विकास कसा करायचा? असा प्रश्न परिषदेने विचारला आहे.वित्त आयोगाला फुटले पायवित्त आयोगाचा निधी येताच त्यातून वेगवेगळ्या खर्चाच्या आयडिया शासन पुढे करत आहे. पाणीयोजना व पथदिव्यांची वीजबिले, संगणक चालकाचे मानधन, दिव्यांगांसाठी खर्च, अंगणवाड्यांसाठी तरतुद, हातपंप दुरुस्ती, करसल्ल्यासाठी खर्च असे नवनवे खर्च वाढत आहेत. निधी देतानाच त्यातील २० टक्के जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी कपात केला आहे. या स्थितीत वित्त आयोग नावालाच राहणार असल्याचे सरपंच परिषदेचे म्हणणे आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगली