शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

नाले, पूरपट्ट्यातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 15:51 IST

आजवर बासनात गुंडाळून ठेवलेले तज्ज्ञांचे सर्व अहवाल विचारात घेतले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सांगली : नैसर्गिक नाले, पूरपट्ट्यातील अनधिकृत बांधकामे यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून याबाबतचा निर्णय शासन लवकरच घेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान आजवर बासनात गुंडाळून ठेवलेले तज्ज्ञांचे सर्व अहवाल विचारात घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, महापुराच्या उपाययोजनांबाबत शासन ठोस पावले उचलणार आहे. पूरपट्टा, नैसर्गिक नाल्यांच्या क्षेत्रात बांधकामे झाली आहेत. त्यावर आम्ही कठोर कारवाई करु. याबाबत कोणाच्या नाराजीचा विचार आम्ही करणार नाही. ज्या नागरी वस्त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे लागेल त्यांच्याबाबतीतही योग्य पर्याय तज्ज्ञांशी चर्चा स्वीकारण्यात येईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महापुराची, दरडी कोसळण्याची वारंवारता समोर येत आहे. त्यामुळे दीर्घकालीन टिकणारे उपाय शोधावे लागणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करुन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. कोणत्याही परिस्थितीत जिवितहानी होऊ न देण्यास प्राधान्यक्रम राहणार आहे. पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करताना दुष्काळग्रस्त भागाकडे पाणी वळवण्याचा सूचना देखील आल्या आहेत. अशा ज्या सूचना येतील, त्यांचा एकत्रितपणे आम्ही विचार करु. भरपाई देण्याबाबत पोकळ आश्वासने देण्याऐवजी कृती करण्यास प्राधान्य राहिल. सांगलीतील पंचनाम्याचे व नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराचे काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे जिल्ह्यातही एकही जिवितहानी झालेली नाही, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

तज्ज्ञांचे अहवाल गुंडाळून ठेवले-

आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत केवळ वडनेरे समितीच नव्हे तर आजवर अनेक तज्ज्ञांच्या समितींमार्फत अहवाल सादर केले गेले. ते बासनात गुंडाळून ठेवले होते. ते सर्व अहवाल आम्ही बाहेर काढून त्यांचा नियोजनात समावेश करणार आहोत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.केंद्र शासनाला पत्र पाठवले-

आपत्तीग्रस्त भागातील विमाधारक पूरग्रस्त शेतकरी, व्यापारी यांना तातडीने विम्याची ५० टक्के रक्कम द्यावी, महसुल विभागाच्या पंचनाम्यावर भरपाई देण्यासह अन्य निकषही बदलावेत, बँकांकडून पूरग्रस्तांना काही सवलत दिली जावी म्हणून आजच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना पाठविण्यात आले आहे. सर्व पक्षाच्या खासदारांनीही केंद्रीय मंत्र्यांना याबाबत भेटावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

तिन्ही जिल्ह्यांचा संयुक्त आराखडा-

ठाकरे म्हणाले की, सांगली, कोल्हापूर, सातारा या तिन्ही जिल्ह्यातील पूरपट्ट्यातील रस्ते, पूल व अन्य सुविधा महापुरात बाधित होऊन नयेत म्हणून एक संयुक्त आराखडा तयार करावा लागेल. या आराखड्यानुसार पूररेषेची काटेकोर अंमलबजावणी करावीच लागेल. त्याचबरोबर कोकण व रायगडमधील आपत्तीचेही व्यवस्थापन करण्यात येईल. दरडींच्या दुर्घटना थांबविण्यासाठी गांभिर्याने पावले-

दरडी कोसळून तळये गावात घडलेली दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून गांभिर्याने पावले उचलावी लागतील. दरडी का कोसळतात, याची कारणे शोधून अशा आपत्ती पुन्हा येऊ नयेत म्हणून करावयाच्या उपाययोजनांवर तातडीने तज्ज्ञांची बैठक घेतली जाईल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSangliसांगलीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfloodपूर