शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नाले, पूरपट्ट्यातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 15:51 IST

आजवर बासनात गुंडाळून ठेवलेले तज्ज्ञांचे सर्व अहवाल विचारात घेतले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सांगली : नैसर्गिक नाले, पूरपट्ट्यातील अनधिकृत बांधकामे यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून याबाबतचा निर्णय शासन लवकरच घेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान आजवर बासनात गुंडाळून ठेवलेले तज्ज्ञांचे सर्व अहवाल विचारात घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, महापुराच्या उपाययोजनांबाबत शासन ठोस पावले उचलणार आहे. पूरपट्टा, नैसर्गिक नाल्यांच्या क्षेत्रात बांधकामे झाली आहेत. त्यावर आम्ही कठोर कारवाई करु. याबाबत कोणाच्या नाराजीचा विचार आम्ही करणार नाही. ज्या नागरी वस्त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे लागेल त्यांच्याबाबतीतही योग्य पर्याय तज्ज्ञांशी चर्चा स्वीकारण्यात येईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महापुराची, दरडी कोसळण्याची वारंवारता समोर येत आहे. त्यामुळे दीर्घकालीन टिकणारे उपाय शोधावे लागणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करुन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. कोणत्याही परिस्थितीत जिवितहानी होऊ न देण्यास प्राधान्यक्रम राहणार आहे. पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करताना दुष्काळग्रस्त भागाकडे पाणी वळवण्याचा सूचना देखील आल्या आहेत. अशा ज्या सूचना येतील, त्यांचा एकत्रितपणे आम्ही विचार करु. भरपाई देण्याबाबत पोकळ आश्वासने देण्याऐवजी कृती करण्यास प्राधान्य राहिल. सांगलीतील पंचनाम्याचे व नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराचे काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे जिल्ह्यातही एकही जिवितहानी झालेली नाही, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

तज्ज्ञांचे अहवाल गुंडाळून ठेवले-

आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत केवळ वडनेरे समितीच नव्हे तर आजवर अनेक तज्ज्ञांच्या समितींमार्फत अहवाल सादर केले गेले. ते बासनात गुंडाळून ठेवले होते. ते सर्व अहवाल आम्ही बाहेर काढून त्यांचा नियोजनात समावेश करणार आहोत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.केंद्र शासनाला पत्र पाठवले-

आपत्तीग्रस्त भागातील विमाधारक पूरग्रस्त शेतकरी, व्यापारी यांना तातडीने विम्याची ५० टक्के रक्कम द्यावी, महसुल विभागाच्या पंचनाम्यावर भरपाई देण्यासह अन्य निकषही बदलावेत, बँकांकडून पूरग्रस्तांना काही सवलत दिली जावी म्हणून आजच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना पाठविण्यात आले आहे. सर्व पक्षाच्या खासदारांनीही केंद्रीय मंत्र्यांना याबाबत भेटावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

तिन्ही जिल्ह्यांचा संयुक्त आराखडा-

ठाकरे म्हणाले की, सांगली, कोल्हापूर, सातारा या तिन्ही जिल्ह्यातील पूरपट्ट्यातील रस्ते, पूल व अन्य सुविधा महापुरात बाधित होऊन नयेत म्हणून एक संयुक्त आराखडा तयार करावा लागेल. या आराखड्यानुसार पूररेषेची काटेकोर अंमलबजावणी करावीच लागेल. त्याचबरोबर कोकण व रायगडमधील आपत्तीचेही व्यवस्थापन करण्यात येईल. दरडींच्या दुर्घटना थांबविण्यासाठी गांभिर्याने पावले-

दरडी कोसळून तळये गावात घडलेली दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून गांभिर्याने पावले उचलावी लागतील. दरडी का कोसळतात, याची कारणे शोधून अशा आपत्ती पुन्हा येऊ नयेत म्हणून करावयाच्या उपाययोजनांवर तातडीने तज्ज्ञांची बैठक घेतली जाईल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSangliसांगलीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfloodपूर