शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या अंगात बळ, पण छातीत कळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 11:00 IST

सामाजिक स्वास्थ्य संतुलित राखण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचे आरोग्य मात्र बिघडत चालले आहे. सलग आणि तणावपूर्ण वातावरणात काम, तास न् तास उभे राहून सुरू असलेल्या बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना हृदयविकारासह अन्य आजार जडले आहेत. पोलिसांची मानसिकता चांगली राहावी, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात असले तरी, कामाचा वाढता ताण कर्मचाºयांसाठी धोकादायक ठरत आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या अंगात बळ, पण छातीत कळ!विश्रांती कमी मिळत असल्यानेही आरोग्यावर परिणाम

शरद जाधव सांगली : सामाजिक स्वास्थ्य संतुलित राखण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचेआरोग्य मात्र बिघडत चालले आहे. सलग आणि तणावपूर्ण वातावरणात काम, तास न् तास उभे राहून सुरू असलेल्या बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना हृदयविकारासह अन्य आजार जडले आहेत. पोलिसांची मानसिकता चांगली राहावी, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात असले तरी, कामाचा वाढता ताण कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.गेल्या आठ महिन्यांचा आढावा घेतला, तर जिल्ह्यातील पोलीस दल थोडा वेळ सोडला, तर कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या बंदोबस्तावर तैनात आहेच. एप्रिल महिन्यातील लोकसभा निवडणूक, त्यानंतर थोड्याच कालावधित महापूर, लगोलग विधानसभा निवडणुकीमुळे पोलीस सलग पोलीस बंदोबस्तात कायम आहेत. ऊन, पावसाची तमा न बाळगता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल कार्यरत आहे.या सलगच्या ड्युटीमुळेच पोलिसांना हृदयविकाराचा मोठा त्रास जाणवत आहे. अनेकवेळा बंदोबस्तासाठी तास न् तास उभे राहावे लागत असल्याने, पायाला सूज, टाचा दुखण्यासह मणक्याचेही विकार जडले आहेत. त्यातच रात्री-अपरात्रीच्या ड्युटीमुळे विश्रांती कमी मिळत असल्यानेही पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.पोलीस दलातील नवीन कर्मचारी व अधिकारी आपल्या आरोग्याबाबत सजग असले तरी, सेवेत काही वर्षे रुळलेल्या कर्मचाऱ्यांना कामाचा वाढता ताण व अन्य कारणामुळे व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यात प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांसाठी परेडसह इतर उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, वाढत्या कामामुळे त्यात कर्मचाऱ्यांना सहभागी होता येत नसल्याचे चित्र आहे.

आरोग्य चांगले राहावे व त्यांना आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी पोलीस दलातर्फे आरोग्य शिबिरांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात येते. मात्र, केवळ मार्गदर्शनाने थोड्या कालावधीकरिता कर्मचाऱ्यांत सजगता निर्माण होत असली तरी, त्यानंतर ती सजगता कायम राहत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगलीHealthआरोग्य