शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

राज्यात लवकरच आठ हजार पोलिसांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:49 IST

लवकरच प्रस्तावित असलेल्या आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंंत्री अनिल देशमुख यांनी दिली

ठळक मुद्देराज्यात लवकरच आठ हजार पोलिसांची भरतीकोरोनामुळे जीव गमाविलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ६५ लाखांपर्यंतची मदत

सांगली : उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस दल कार्यरत आहे. मात्र, आता कोरोनाचे संकट अटोक्यात आल्यानंतर लवकरच प्रस्तावित असलेल्या आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.गृहमंत्री देशमुख म्हणाले, कोरोनामुळे संपूर्ण जगभरात संकट निर्माण झाले असताना, त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलिसांनी राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावत आहे. कोरोना संसर्ग वाढण्याअगोदरच राज्यात आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया विचारात होती. मात्र, आता कोरोनाचे संकट अटोक्यात आल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.कोरोनामुळे जीव गमाविलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ६५ लाखांपर्यंतची मदत करण्यात येत आहे. शिवाय आता नवीन निर्णयानुसार त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत त्यांना शासकीय निवासस्थानात राहता येणार आहे.

पोलीस दलातील सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना जोखमीचा बंदोबस्त देण्यात येऊ नये, याबाबतच्याही सूचना दिल्या आहेत. पोलीस दलातील प्रत्येक घटकाची कोरोना कालावधित काळजी घेण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसSangliसांगली