शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लवकरच आठ हजार पोलिसांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:49 IST

लवकरच प्रस्तावित असलेल्या आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंंत्री अनिल देशमुख यांनी दिली

ठळक मुद्देराज्यात लवकरच आठ हजार पोलिसांची भरतीकोरोनामुळे जीव गमाविलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ६५ लाखांपर्यंतची मदत

सांगली : उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस दल कार्यरत आहे. मात्र, आता कोरोनाचे संकट अटोक्यात आल्यानंतर लवकरच प्रस्तावित असलेल्या आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.गृहमंत्री देशमुख म्हणाले, कोरोनामुळे संपूर्ण जगभरात संकट निर्माण झाले असताना, त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलिसांनी राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावत आहे. कोरोना संसर्ग वाढण्याअगोदरच राज्यात आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया विचारात होती. मात्र, आता कोरोनाचे संकट अटोक्यात आल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.कोरोनामुळे जीव गमाविलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ६५ लाखांपर्यंतची मदत करण्यात येत आहे. शिवाय आता नवीन निर्णयानुसार त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत त्यांना शासकीय निवासस्थानात राहता येणार आहे.

पोलीस दलातील सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना जोखमीचा बंदोबस्त देण्यात येऊ नये, याबाबतच्याही सूचना दिल्या आहेत. पोलीस दलातील प्रत्येक घटकाची कोरोना कालावधित काळजी घेण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसSangliसांगली