शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

राज्यात लवकरच आठ हजार पोलिसांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:49 IST

लवकरच प्रस्तावित असलेल्या आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंंत्री अनिल देशमुख यांनी दिली

ठळक मुद्देराज्यात लवकरच आठ हजार पोलिसांची भरतीकोरोनामुळे जीव गमाविलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ६५ लाखांपर्यंतची मदत

सांगली : उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस दल कार्यरत आहे. मात्र, आता कोरोनाचे संकट अटोक्यात आल्यानंतर लवकरच प्रस्तावित असलेल्या आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.गृहमंत्री देशमुख म्हणाले, कोरोनामुळे संपूर्ण जगभरात संकट निर्माण झाले असताना, त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलिसांनी राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावत आहे. कोरोना संसर्ग वाढण्याअगोदरच राज्यात आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया विचारात होती. मात्र, आता कोरोनाचे संकट अटोक्यात आल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.कोरोनामुळे जीव गमाविलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ६५ लाखांपर्यंतची मदत करण्यात येत आहे. शिवाय आता नवीन निर्णयानुसार त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत त्यांना शासकीय निवासस्थानात राहता येणार आहे.

पोलीस दलातील सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना जोखमीचा बंदोबस्त देण्यात येऊ नये, याबाबतच्याही सूचना दिल्या आहेत. पोलीस दलातील प्रत्येक घटकाची कोरोना कालावधित काळजी घेण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसSangliसांगली