शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

आचारसंहितेपूर्वी टेंभूच्या उर्वरित कामांना निधी द्या, अन्यथा..; भारत पाटणकरांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 13:46 IST

आटपाडी : टेंभू योजनेच्या वंचित गावांच्या कामांना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी निधी देऊन तत्काळ कामे सुरू करावीत, अन्यथा विशेष अधिवेशनाच्या ...

आटपाडी : टेंभू योजनेच्या वंचित गावांच्या कामांना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी निधी देऊन तत्काळ कामे सुरू करावीत, अन्यथा विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुबंई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा लिंगीवरे (ता. आटपाडी) येथील पाणीपरिषदेत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. यावेळी विविध ठराव करण्यात आले आहे.बुधवारी लिंगीवरे येथील धुळाजी झिंबल हायस्कूलच्या मैदानावर पाणी परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे नेते आनंदराव पाटील, साहेबराव चवरे, जनार्दन झिंबल, विजयसिंह पाटील, महादेव देशमुख, मनोहर विभूते, बाळासाहेब पाटील, सादिक खाटिक, दत्तात्रय यमगर, नानासाहेब मोटे, दादासाहेब हुबाले उपस्थित होते.यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, आटपाडी तालुक्यातील टेंभूच्या पाण्यापासून वंचित असणारी १२ गावे २०१९ मध्येच समाविष्ट झाली आहेत. नव्याने काही जणांनी सुप्रमा मंजूर झाल्याच्या उद्घोषणा केल्या आहेत. मात्र त्या गावचा समावेश २०१९ मध्येच झाला आहे. सुप्रमा जरी आता मंजूर झाली असली तरी सध्या त्या कामाला निधी मिळणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ५ हजार घनमीटर प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी आनंदराव पाटील म्हणाले, चळवळीच्या रेट्यामुळेच टेंभू योजनेचे ८५ टक्के पाणी मिळाले आहे. शासनाकडे पहाटेचा शपथविधी व प्रवेश सोहळा घेण्यास वेळ आहे. मात्र दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यास वेळ नसल्याची टीका केली. यासाठी राज्य शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.राज्यशासनाने दुष्काळी भागातील जनतेला विश्वासात घेऊन लवकर निधी मंजूर करावा, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा ही देण्यात आला आहे. राजेवाडी तलाव हा सांगली पाटबंधारे विभागाला जोडावा तरच राजेवाडी परिसरातील नागरिकांना लाभ होईल. राजेवाडी तलावात उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी केली जाते. मात्र उरमोडीकडे पाणी शिल्लक नाही व जिहे कटापूर योजना आठ महिन्यांची आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी